शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ५८४ नवजात बालकांचा मृत्यू

By admin | Updated: May 10, 2014 00:16 IST

गोंदिया बाल व मातामृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही.

नरेश रहिले - गोंदिया बाल व मातामृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यात ५८४ नवजात बालके दगावल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे. शहरी भागात माता मृत्यू नसले तरी ग्रामीण भागात १५ गर्भवती महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे. प्रसुतीदरम्यान बालमृत्यू व माता मृत्यू होऊ नये यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा अनेक योजना अंमलात आणून महिलांची प्रसुती आरोग्य संस्थेतच करावी यासाठी जनजागृती केली. तरी देखील जिल्ह्यातील बालमृत्यू थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात २१ तर शहरी भागात १२ अशा ३३ बालकांचा मृत्यू झाला. मे महिन्यात ग्रामीण भागात २४ तर शहरी भागात २३ अशा ४७ बालकांचा मृत्यू झाला. जून महिन्यात ग्रामीण भागात २७ तर शहरी भागात १६ अशा ४३ बालकांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ग्रामीण भागात २५, शहरी भागात ३६ अशा ६१ बालकांचा मृत्यू झाला. आॅगस्ट महिन्यात ग्रामीण भागात २८ तर शहरी भागात ३१ अशा ५९ बालकांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागात २३ तर शहरी भागात ३३ अशा ५६ बालकांचा मृत्यू झाला. आॅक्टोबर महिन्यात ग्रामीण भागात २२ तर शहरी भागात २० अशा ४२ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. नोव्हेंबर महिन्यात ग्रामीण भागात ३२ तर शहरी भागात २६ अशा ५८ बालकांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात २७, शहरी भागात २५ अशा ५१ बालकांचा मृत्यू झाला. नवीन वर्षातही या मृत्यूसत्रात कोणताही फरक पडला नाही. जानेवारी महिन्यात ग्रामीण भागात ३२ तर शहरी भागात २० अशा ५२ बालकांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागात २१ आणि शहरी भागात २० अशा ४१ बालकांचा आणि मार्च महिन्यात ग्रामीण भागात १७ तर शहरी भागात २० अशा ३७ बालकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने बालमृत्यू टाळण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न करायला हवे त्या प्रमाणात प्रयत्न झालेले नाही. ग्रामीण भागातील महिलांना सकस आहार व वेळोवेळी औषधोपचार करण्यासाठी सल्ला दिला जातो. तरीदेखील बालमृत्यू होणे ही बाब प्रशासनाचे अपयश असल्याचे मानले जाते. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे बालमृत्यूचा आकडा वर्षभरात ५८४ वर गेला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा, मनुष्यबळाची कमतरता व ठरविलेले नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे बालमृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रसुतीदरम्यान महिलांची योग्य काळजी घेतली नसल्यामुळे बालकांचा मृत्यू झाला आहे.