शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

वर्षभरात ५८४ नवजात बालकांचा मृत्यू

By admin | Updated: May 10, 2014 00:16 IST

गोंदिया बाल व मातामृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही.

नरेश रहिले - गोंदिया बाल व मातामृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यात ५८४ नवजात बालके दगावल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे. शहरी भागात माता मृत्यू नसले तरी ग्रामीण भागात १५ गर्भवती महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे. प्रसुतीदरम्यान बालमृत्यू व माता मृत्यू होऊ नये यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा अनेक योजना अंमलात आणून महिलांची प्रसुती आरोग्य संस्थेतच करावी यासाठी जनजागृती केली. तरी देखील जिल्ह्यातील बालमृत्यू थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात २१ तर शहरी भागात १२ अशा ३३ बालकांचा मृत्यू झाला. मे महिन्यात ग्रामीण भागात २४ तर शहरी भागात २३ अशा ४७ बालकांचा मृत्यू झाला. जून महिन्यात ग्रामीण भागात २७ तर शहरी भागात १६ अशा ४३ बालकांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ग्रामीण भागात २५, शहरी भागात ३६ अशा ६१ बालकांचा मृत्यू झाला. आॅगस्ट महिन्यात ग्रामीण भागात २८ तर शहरी भागात ३१ अशा ५९ बालकांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागात २३ तर शहरी भागात ३३ अशा ५६ बालकांचा मृत्यू झाला. आॅक्टोबर महिन्यात ग्रामीण भागात २२ तर शहरी भागात २० अशा ४२ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. नोव्हेंबर महिन्यात ग्रामीण भागात ३२ तर शहरी भागात २६ अशा ५८ बालकांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात २७, शहरी भागात २५ अशा ५१ बालकांचा मृत्यू झाला. नवीन वर्षातही या मृत्यूसत्रात कोणताही फरक पडला नाही. जानेवारी महिन्यात ग्रामीण भागात ३२ तर शहरी भागात २० अशा ५२ बालकांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागात २१ आणि शहरी भागात २० अशा ४१ बालकांचा आणि मार्च महिन्यात ग्रामीण भागात १७ तर शहरी भागात २० अशा ३७ बालकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने बालमृत्यू टाळण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न करायला हवे त्या प्रमाणात प्रयत्न झालेले नाही. ग्रामीण भागातील महिलांना सकस आहार व वेळोवेळी औषधोपचार करण्यासाठी सल्ला दिला जातो. तरीदेखील बालमृत्यू होणे ही बाब प्रशासनाचे अपयश असल्याचे मानले जाते. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे बालमृत्यूचा आकडा वर्षभरात ५८४ वर गेला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा, मनुष्यबळाची कमतरता व ठरविलेले नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे बालमृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रसुतीदरम्यान महिलांची योग्य काळजी घेतली नसल्यामुळे बालकांचा मृत्यू झाला आहे.