शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

सहा महिन्यांत दगावले २८४ बालक

By admin | Updated: October 29, 2014 22:51 IST

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष आहे असे सांगितले जाते. असे असताना एकीकडे राज्यात बालमृत्युचे प्रमाण १००० मागे २७ असताना गोंदिया

पाच मातांचाही मृत्यू : बालमृत्यूचे प्रमाण वाढले, हजारामागे ३०.६५नरेश रहिले - गोंदियागोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष आहे असे सांगितले जाते. असे असताना एकीकडे राज्यात बालमृत्युचे प्रमाण १००० मागे २७ असताना गोंदिया जिल्ह्यात मात्र हे प्रमाण १००० मागे ३०.६५ एवढे आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २८४ बालके दगावली आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २३९ उपकेंद्र, ४० प्राथमिक आरोग्य केंद्र, ११ ग्रामीण रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, एक जिल्हा सामान्य रुग्णालय व एक महिला जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. दरवर्षी २० हजाराच्या जवळपास महिलांची प्रसूती जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये होत असते. यातील सर्वाधिक प्रसूती बाई गंगाबाई जिल्हा सामान्य रुग्णालयात होते. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या काळात ९ हजार ३५६ महिलांच्या प्रसूती करण्यात आल्या. त्यापैकी ९ हजार २६६ बालके जिवंत आहेत. १६३ महिलांच्या पोटातच बाळ मृत झाले होते. या सहा महिन्याच्या काळात जन्मलेल्या ८३ बालकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत बालकांपैकी ० ते १ वर्षे वयोगटात २४६ तर १ ते ६ वर्ष वयोगटातील ३८ बालकांचा समावेश आहे. जन्मल्यानंतर २४ तासात ८० बालके दगावली, १ ते ७ दिवसात १०१ बालके दगावली, ७ ते २८ दिवसात ३३ बालके, १ महिना ते १ वर्ष या वयातील ३२ बालके दगावली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या उपजत मृत्युदर २६.५५ टक्के आहे. तर माता मृत्यु दर ०.५४ टक्के आहे. जिल्ह्यातील २३९ उपकेंद्रांमध्ये २ हजार ८२४ प्रसूती, तर ४० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १ हजार ३६९ प्रसुती झाल्या आहेत. गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ४ हजार १०९, खाजगी रुग्णालयात १ हजार ७, घरगुती बाळंतपण ४७ करण्यात आले. यात ६८ बालके जुळे जन्माला आली आहेत. शासनाने माता मृत्युदराला शून्यावर आणण्याचे आवाहन केले असले तरी जिल्ह्यात ६ महिन्यात पाच मातांचा मृत्यू झालेला आहे. राज्य शासन बालमृत्यु दर कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र बालमृत्युची आकडेवारी कमी होण्यापेक्षा सतत वाढत आहे.