शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
5
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
6
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
7
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
8
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
9
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
10
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
11
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
12
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
13
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
14
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
15
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा
16
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
17
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
18
जागतिक IVF दिन: IVF हा जोडप्यांसाठी आशेचा किरण; पण 'या' चुकांमुळे पदरी पडते निराशा!
19
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
20
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?

११३ बालमजुरांसाठी उघडल्या ४ संक्रमण शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:03 IST

बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे यांचा पुढाकार : २२५ विद्यार्थी गेले नियमित शाळेत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यात बालमजूरी करणाºयांचीही संख्या कमी नाही. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने जून २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पकडलेल्या ११३ बालकांसाठी गोंदिया शहरात चार संक्रमण शाळा उघडल्या आहेत.कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक जिल्ह्यात आहेत. आई-वडीलांच्या दुर्लक्षामुळे मांग गारुडी, नाथजोगी, फकीर यांची मुले बालमजूरीकडे वळतात. या बालमजूरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या प्रशिक्षण केंद्राची संख्या १६ झाली आहे.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकाराने बालकामगारांसाठी चार शाळा उघडण्यात आल्या. या १६ केंद्रात ४५७ बालमजूर शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजय नगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यात बाबाटोली, मुरकुडोह दंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू होते.आता पुन्हा चार केंद्र सुरू करण्यात आले. हे चारही केंद्र गोंदिया शहरात आहेत. सुंदरनगर, यादव चौक, गड्डाटोली व छोटा गोंदिया केंद्र सुरू करण्यात आले.सुंदरनगर व यादव चौकात येथे ३० बालके, गड्डाटोली येथे २२ बालके व छोटा गोंदिया केंद्रात ३१ बालके असे ११३ बालके या चार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहेत. मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहेत.१६२१ बालके मुख्यप्रवाहातबाल कामगार कार्यालयद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगार प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके स्वत:च्या पायावर उभे झाले आहेत. काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. बाल मजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात.सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला १५० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी आहे. बालमजूरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत. आई वडीलांच्या व्यसनामुळे बालमजूरी फोफावत आहे. मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले.बालकामगारांसाठी १६ शाळाबालकामगारांच्या उत्थानासाठी शासनाकडून गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १६ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात बाबाटोली, गौतमनगर, गोंडीटोला, कुडवा, भीमनगर, काचेवानी, दंडारी, नवरगाव, तिरोडा, मुंडीकोटा, मूर्री, अदासी, गोंदिया शहरातील सुंदरनगर, यादव चौक, गड्डाटोली व छोटा गोंदिया या ठिकाणी शाळा तयार करण्यात आले आहे.