शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

११३ बालमजुरांसाठी उघडल्या ४ संक्रमण शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:03 IST

बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे यांचा पुढाकार : २२५ विद्यार्थी गेले नियमित शाळेत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यात बालमजूरी करणाºयांचीही संख्या कमी नाही. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने जून २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पकडलेल्या ११३ बालकांसाठी गोंदिया शहरात चार संक्रमण शाळा उघडल्या आहेत.कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक जिल्ह्यात आहेत. आई-वडीलांच्या दुर्लक्षामुळे मांग गारुडी, नाथजोगी, फकीर यांची मुले बालमजूरीकडे वळतात. या बालमजूरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या प्रशिक्षण केंद्राची संख्या १६ झाली आहे.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकाराने बालकामगारांसाठी चार शाळा उघडण्यात आल्या. या १६ केंद्रात ४५७ बालमजूर शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजय नगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यात बाबाटोली, मुरकुडोह दंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू होते.आता पुन्हा चार केंद्र सुरू करण्यात आले. हे चारही केंद्र गोंदिया शहरात आहेत. सुंदरनगर, यादव चौक, गड्डाटोली व छोटा गोंदिया केंद्र सुरू करण्यात आले.सुंदरनगर व यादव चौकात येथे ३० बालके, गड्डाटोली येथे २२ बालके व छोटा गोंदिया केंद्रात ३१ बालके असे ११३ बालके या चार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहेत. मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहेत.१६२१ बालके मुख्यप्रवाहातबाल कामगार कार्यालयद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगार प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके स्वत:च्या पायावर उभे झाले आहेत. काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. बाल मजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात.सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला १५० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी आहे. बालमजूरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत. आई वडीलांच्या व्यसनामुळे बालमजूरी फोफावत आहे. मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले.बालकामगारांसाठी १६ शाळाबालकामगारांच्या उत्थानासाठी शासनाकडून गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १६ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात बाबाटोली, गौतमनगर, गोंडीटोला, कुडवा, भीमनगर, काचेवानी, दंडारी, नवरगाव, तिरोडा, मुंडीकोटा, मूर्री, अदासी, गोंदिया शहरातील सुंदरनगर, यादव चौक, गड्डाटोली व छोटा गोंदिया या ठिकाणी शाळा तयार करण्यात आले आहे.