शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय आता नेमके होणार तरी कुठे?; आमदारांमध्ये मतभिन्नता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:51 IST

जागा ठरली नसल्याचे नियोजन व सांख्यिकी खात्याचे म्हणणे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे असावे, हे अजून ठरलेले नाही, असे स्पष्टीकरण नियोजन व सांख्यिकी खात्याने काल, रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. आजी-माजी आमदारांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणाबाबत मतभिन्नता असल्याने या प्रश्नावर आता काय तोडगा येतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

केपेचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी नगरसेवक, सरपंच, पंच यांच्या शिष्टमंडळासह शनिवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपेंत स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही तासांतच खात्याकडून हे स्पष्टीकरण आले आहे.

धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यांचा समावेश असलेला तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. मुख्यालय कुडचडेत असेल, असेही मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा हवाला देऊन प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. परंतु आता नगरनियोजन खात्याने मुख्यालयाची जागा अजून ठरलेली नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

दरम्यान, नव्याने निर्माण होणार असलेल्या तिसऱ्या जिल्ह्यातील चारही तालुके दुर्गम आहेत. या भागातील लोकांना सरकारी कामांसाठी मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावे लागत असे. प्रशासकीय सोयीसाठी तसेच लोकांना जलद सेवा मिळावी, यासाठी तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे.

कुडचडेच योग्य ठरेल, कारण कनेक्टिव्हिटी आहे : काब्राल

या विषयावर कुडचडेंचे आमदार नीलेश काब्राल म्हणाले की,' मुख्यालयासाठी कुडचडें हीच जागा योग्य आहे. कारण येथे कनेक्टिव्हिटी आहे. मोठे बसस्थानक, रेल्वे स्थानक आहे. बंदराचीही सोय आहे. केपेत उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे ते असू द्या. कुडचडेत जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आहेत. त्यामुळे कुडचडे हीच जागा जिल्हा मुख्यालयासाठी असावी, अशी आमची मागणी आहे.

केपेबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक, ती जागाच योग्य : कवळेकर

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले ऐकून घे असून केपेत तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय करण्याबाबत ते सकारात्मक आहेत. आम्ही निदर्शनास आणलेल्या प्रत्येक गोष्टींची नोंद त्यांनी करून घेतली आहे. केपे तालुक्याला याआधीच उपजिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. तेथे उपजिल्हाधिकारी कार्यालयही अस्तित्वात आहे. तसेच प्रथम श्रेणी न्यायालय आणि महत्त्वाची प्रशासकीय कार्यालयेही आहेत. मुख्यालय केपेतच होणे योग्य ठरेल. आम्ही मुख्यमंत्र्यांना याविषयी सर्व माहिती दिली आहे. सर्व सुविधा असल्याने येथेच जिल्हा मुख्यालय योग्य ठरेल.'

मुख्यालय केपेंतच हवे : एल्टन डिकॉस्ता

काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनीही मुख्यालय केपेतच हवे यावर जोर दिला. ते म्हणाले की, 'बस कनेक्टिव्हिटी व इतर गोष्टी पाहता मुख्यालय केपेतच हवे. येथे बहुतांश लोक अनुसूचित जमातींचे आहेत. त्यांच्याकडे चारचाकी वगैरे नाहीत. काहीजणांकडे दुचाकीही नाहीत. तिसऱ्या जिल्ह्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु मुख्यालय कुडचडेत केल्यास केपेवासीयांना त्याचा त्रास होईल. कुडचडेंत रस्ते वगैरे खराब आहेत.'असलेल्या तिसऱ्या जिल्ह्यातील चारही तालुके दुर्गम आहेत. या भागातील लोकांना सरकारी कामांसाठी मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावे लागत असे. प्रशासकीय सोयीसाठी तसेच लोकांना जलद सेवा मिळावी, यासाठी तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार