शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

कॉँग्रेसच्या निष्क्रिय नेत्यांचा नंबर कधी?

By admin | Updated: June 23, 2014 01:38 IST

दिग्विजय सिंग गुरुवारी गोव्यात : प्रवक्त्यांच्या हकालपट्टीनंतर विचारणा

पणजी : निष्क्रिय प्रवक्त्यांना काँग्रेसने बाहेरचे दरवाजे दाखवल्यानंतर आता पक्षातील निष्क्रिय नेत्यांची पाळी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसच्या कुचकामी नेत्यांबद्दल पक्षातच तीव्र असंतोष आहे. त्यामुळे अशा नेत्यांना नारळ कधी देणार, याची काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. २0१२ च्या विधानसभा निवडणुकीत फॅमिली राजने धोका दिलेल्या कॉँग्रेसला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. तरीही काँग्रेसमधील गटबाजी संपलेली नाही. नेत्यांची टोकाची निष्क्रियता, अंतर्गत गटबाजी आणि धुसफूस आता लपून राहिलेली नाही. दोन्ही निवडणुकांत पाठोपाठ दारुण पराभव पत्करावा लागल्याने या सर्व गोष्टी आता उघड झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्याशी अनेकांचे पटत नाही. कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता बोलत असल्याने ते नाराजी ओढवून घेतात. ज्युनियर राणे अर्थात विश्वजीत यांचा प्रदेशाध्यक्षांना नेहमीच विरोध असतो. खाण घोटाळ्यात ठपका असलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आयडीसी घोटाळा प्रकरणी आमदार बाबू कवळेकर हे कधी कारवाईला सामोरे जातील, याची शाश्वती नसल्याने तोंड बंदच ठेवून आहेत. आमदार बाबूश मोन्सेरात काँग्रेसमध्ये असले तरी ते आपल्याला स्वतंत्र मानतात. ते आपला सावकारी, रियल इस्टेट, हॉटेल्सचा धंदा सांभाळून आहेत. पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात तसेच आमदार पांडुरंग मडकईकर हा त्यांचा गट मानला जातो. काँग्रेस विधिमंडळातच आमदारांमध्ये तीन गट आहेत. बाबूश मोन्सेरात, पत्नी जेनिफर व पांडुरंग मडकईकर एक गट, दिगंबर कामत व बाबू कवळेकर दुसरा गट आणि राणे पिता-पुत्र तिसरा असे हे गट आहेत. त्यामुळे आमदारांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. केवळ आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हेच तेवढे निष्ठावान दिसतात. माविन गुदिन्हो यांनी तर काँग्रेसवर उघड तोंडसुख घेणे सुरू केले आहे. त्याही पुढे जाऊन बाबूश यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासाठी कामच केले नाही, असे जाहीर सांगितले होते. दरम्यान, माजी आमदार तथा प्रवक्तेपदावरून काढून टाकलेले जितेंद्र देशप्रभू म्हणाले की, निष्क्रियता का आली याची कारणे शोधण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात नेते का कमी पडले हे शोधण्याची गरज आहे. कोणीही निष्क्रिय नसतो, त्यासाठी वातावरण आणि काही कारणे असू शकतात. निष्क्रियता ही कारवाईसाठी प्राथमिकता असता कामा नये. विरोधी पक्षनेत्याचे विधानसभेतील काम चांगले आहे. प्रत्येक काम सत्ताधाऱ्यांना घेरूनच करून घेता येईल, असे नाही. राणे मुत्सद्दी आहेत. प्रवक्तेपदावरून हटविल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, तरुणांना वाव देण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलले असेल तर त्याचे मी स्वागत करतो. (प्रतिनिधी)