शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

‘सनबर्न’ ही गोव्याची संस्कृती नव्हे : पार्सेकर

By admin | Updated: December 28, 2014 09:38 IST

साखळी येथे रवींद्र महोत्सवाचे उद्घाटन : विविध कार्यक्रमांचे आयोजन; मनोहर पर्रीकर यांचा सत्कार

डिचोली : गोव्याचे सांस्कृतिक वैभव विविध लोककलांच्या माध्यमातून टिकविण्यात आलेले आहे़ ‘सनबर्न पार्टी’ म्हणजे गोव्याची संस्कृती नव्हे़ त्यामुळे गोव्याची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी रवींद्र महोत्सवासारख्या उत्सवांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले़ साखळी रवींद्र भवनमध्ये आयोजित रवींद्र महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उपसभापती अनंत शेट, डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते़ दि़ २७ व २८ असे दोन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे़ महोत्सवात विविध स्पर्धा, शैक्षणिक आणि शेतीविषयक उपक्रम राबविण्यात आले आहेत़ तसेच उद्योग विश्वाबाबत तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत़ या वेळी पार्सेकर म्हणाले की, मये गावाला पूर्ण मुक्ती देण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे़ लवकरच हे काम पूर्ण होईल, असे सांगितले़ केवळ सांस्कृतिकच नव्हे तर कला, नाट्य, कृषी, शिक्षण, उद्योग यामध्ये संपन्नता आणणारा हा महोत्सव असल्याचे पार्सेकर सांगितले़ डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, साखळी येथील रवींद्र भवन डिचोली व साखळी परिसरातील कलाकार व जनतेसाठी वरदान ठरणारे आहे़ वर्षभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्याचे सांस्कृतिक वैभव जोपासण्याचा प्रयत्न करू. उपसभापती अनंत शेट यांनी या महोत्सवात गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडल्याचे सांगितले़ या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, ज्येष्ठ चित्रकार शिवानंद खेडेकर, डॉ. गुरू प्रसाद कानडी व शिक्षक गजानन कर्पे यांचा मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साखळी रवींद्र भवनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले़ या वेळी रवींद्र काणेकर, उमेश सरनाईक, उपेंद्र कर्पे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)