शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

५.२३ लाख नागरिकांना अन्न सुरक्षेचे संरक्षण

By admin | Updated: February 17, 2015 02:26 IST

पणजी : राज्यात ५ लाख २३ हजार नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, असे लक्ष्य नागरी पुरवठा खात्याने

पणजी : राज्यात ५ लाख २३ हजार नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, असे लक्ष्य नागरी पुरवठा खात्याने आखलेले आहे. अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी रेशनकार्डांच्या डिजिटलायझेशनचे काम होणे आवश्यक असून आता तालुका व ग्रामपातळीवर काम सुरू करण्यात येणार आहे. राज्यात रेशनकार्डांचे डिजिटलायझेशन होणे अत्यंत आवश्यक आहे. डिजिटलायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कुटुंबांना योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात रेशनचे धान्य उपलब्ध होईल. राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस रेशनकार्डे आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, एका घरात तीन ते चार रेशनकार्ड करण्यात आली आहेत. लग्नापूर्वी पालकांच्या रेशनकार्डवर नावे आहेत. तर लग्नानंतर वेगळे रेशनकार्ड करूनही दोन रेशनकार्डवर नावे आहेत. त्यामुळे एका घरात एका व्यक्तीला दोन रेशनकार्डद्वारे धान्य जाते. काही नागरिक विदेशी किंवा इतर राज्यांत स्थायिक आहेत. मात्र, त्यांच्या नावाचे रेशनधान्य उचलले जाते. डिजिटलायझेशन प्रक्रियेनंतर ही गफलत होणार नाही. तसेच आवश्यक नागरिकांना आवश्यक रेशनधान्य देता येईल. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात ५ लाख २३ हजार नागरिकांना रेशनधान्याचा लाभ घेता यावा, असे काम केले जाईल. यासाठी प्रामुख्याने जनतेकडून सहकार्य मिळण्याची आवश्यकता आहे. अन्न सुरक्षा योजनेतंर्गत ३ रुपये किलो तांदूळ, २ रुपये किलो गहू आणि १ रुपये किलो दराने साखर नागरिकांना मिळेल, असे नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)