शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

मंत्र्यांचे ‘विमान’ जमिनीवर!

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

पणजी : राज्यातील काही मंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या विदेश दौऱ्यांवर देशभरातून सडकून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी

पणजी : राज्यातील काही मंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या विदेश दौऱ्यांवर देशभरातून सडकून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आता विदेश दौैऱ्यांबाबत निकष निश्चित करण्यास मुख्य सचिवांना सांगितले आहे. मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी चर्चा केली व विदेश दौऱ्यांबाबत काही निकष ठरविण्यास मुख्य सचिवांना सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले की, मंत्र्यांनी विदेश दौरे केल्याने विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाता येते. जगात काय घडत आहे, ते मत्र्यांना अशा दौऱ्यांमधून कळते. ज्यांच्याकडून कायदे तयार केले जातात, अशा लोकप्रतिनिधींना असा ‘एक्सपोजर’ मिळायलाच हवा. मात्र, चुकीच्या माणसांनी उगाच विदेश दौऱ्यांवर जाऊन अनाठायी खर्चही करू नये. यासाठीच मंत्री-आमदारांनी विदेश दौरे कधी करावेत, याबाबतचे निकष ठरविण्यास आपण मुख्य सचिवांना सांगितले आहे. ‘कॅग’ने आपल्या अहवालात मंत्र्यांनी सरकारी खर्चाने केलेल्या विदेश दौऱ्यांवर बोट ठेवले आहे. २00७ ते २0१२ या कालावधीत राज्य सरकारकडून ‘रोड शो’वर १९ कोटी खर्च करण्यात आले. काही मंत्री तर शासकीय खर्चाने जग फिरले आहेत. (खास प्रतिनिधी)