शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी गोव्याच्या आशा पल्लवित

By admin | Updated: July 26, 2016 02:40 IST

डिचोली : म्हादईप्रश्नी सोमवारी कर्नाटकाच्या पाणी वळवण्याच्या मागणीला विरोध करताना आत्माराम नाडकर्णी यांनी अतिशय प्रभावीपणे

डिचोली : म्हादईप्रश्नी सोमवारी कर्नाटकाच्या पाणी वळवण्याच्या मागणीला विरोध करताना आत्माराम नाडकर्णी यांनी अतिशय प्रभावीपणे गोव्याची बाजू मांडताना कर्नाटकाचे सर्व दावे उद््ध्वस्त करण्याजोगा युक्तिवाद केल्याने कर्नाटकाचे वरिष्ठ वकील व त्यांची टीम अस्वस्थ झाल्याचे जाणवले. आपल्या अभ्यासपूर्ण युक्तिवादात नाडकर्णी यांनीअतिशय प्रभावीपणे कर्नाटकाचे सर्व दावे खोडून काढल्याने कर्नाटकाच्या कायदेतज्ज्ञांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने जोडयाचिका सादर करण्याचा निर्णय घेताना, ही जोडयाचिका पूर्वी दाखल केलेली असल्याने त्याबाबत लवादाने याची दखल घेतलेली असून गोव्याची बाजू आजच्या घडीला मजबूत असल्याचे दिसून आले. कर्नाटकाचे वरिष्ठ वकील फली नरिमन व टीमच्या चेहऱ्यावर निराशेची छाया दिसून आली. आत्माराम नाडकर्णी यांनी आपला युक्तिवाद पूर्ण करण्यापर्यंत भूमिका मांडलेली असतानाच शेवटचा उपाय म्हणून कर्नाटकाने पुन्हा जोडयाचिकेद्वारे नवे मुद्दे सादर केलेले आहेत. नरिमन यांनी पुन्हा नव्याने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. लवादाने याप्रकरणी निवाडा राखून ठेवलेला असून बुधवारी याप्रश्नी पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती दिल्लीतून देण्यात आली. कर्नाटकाने दुष्काळग्रस्त भागासाठी ७ टीएमसी पाण्याची केलेली मागणी कशी खोटी व चुकीची आहे, हे नाडकर्णी यांनी लवादाला पटवून दिले. कर्नाटकाने म्हादई ही अतिरिक्त साठा असल्याचे दाखवलेले नाही. त्यामुळे ते दाखविल्याशिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे पाणी नेता येत नाही. पाणी वळवण्याचा प्रयत्न झाल्यास सुर्ला नाला उद््ध्वस्त होणार असून त्याचा पश्चिम घाट व म्हादई अभयारण्याच्या जीवनचक्रावर परिणाम होणार असल्याचे नाडकर्णी यांनी लक्षात आणून दिले. गोव्याने जून ते सप्टेंबर महिन्यांत कमी पावसामुळे कशाप्रकारे म्हादईचे पात्र गांजेपर्यंत कमी होते ते दाखवून दिलेले आहे. येथून पाणी मोपा प्रकल्पाला पंपिंग होते. पाण्याची खोली ३ मीटरपेक्षा कमी असल्याने पाणी पंपिंग होत नाही हेही लक्षात आणून दिले. खाण पट्ट्यातील पाणी पंपिंग करून वापरावे लागत असल्याचे सांगण्यात आले. गोव्यातील १८ पैकी १६ बंधारे मे २०१६ मध्ये पूर्ण सुकून गेले. कमी पावसामुळे जर ही परिस्थिती गोव्यावर उद््भवत आहे, तर मग ७ टीएमसी पाणी कर्नाटकाला वळवण्यास दिले तर या भागाची काय भीषण अवस्था होईल याचे वास्तव चित्र नाडकर्णी यांनी लवादासमोर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेले आहे. पाणी वळवण्यात आले तर गोव्यावर पिण्याच्या पाण्याचे व सिंचनासाठी भीषण परिणाम जाणवणार आहेत. ज्या सिंचन योजना आहेत, त्या गुंडाळाव्या लागतील. तसेच वन्यजीव, जलवाहतूक यावरही परिणाम होणार असल्याचे लक्षात आणून दिले आहे. कोणत्याही अभयारण्याच्या क्षेत्रात येणारे पाणी अडवता येत नाही. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अभयारण्यातील वन्यजीव व वनस्पतींचे रक्षण होण्यासाठी केंद्राने खास कायदा केलेला असून त्यामुळे कर्नाटकाने म्हादई अभयारण्यातून जाणाऱ्या पाण्याला वळवण्याचा केलेला प्रयत्न हा बेकायदा असल्याचा युक्तिवाद गोव्यातर्फे करण्यात आला आहे. प्रत्यक्षात कर्नाटकाने पाणी वळवण्याची केलेली मागणी ही लवादाच्या कक्षेबाहेरील आहे. या एकूण युक्तिवादामुळे कर्नाटकाच्या पायाखालची वाळू सरकलेली असून २७ रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)