शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

राज्यात एप्रिलपासून हेल्मेटसक्ती

By admin | Updated: January 10, 2015 01:24 IST

वाहतूक खाते दक्ष : सर्व रस्त्यांवर, मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट बंधनकारक?

पणजी : राज्यात दुचाकींच्या होणाऱ्या अपघातांतून चालकांच्या मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता एप्रिल २0१५पासून सर्व रस्त्यांवर हेल्मटसक्ती करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. चालक आणि मागे बसणाऱ्या स्वारासही हेल्मेट वापरणे सक्तीचे होणार आहे. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी माहिती दिली. गेल्या दोन वर्षांची तुलना करता राज्यात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यात हेल्मेट न वापरल्यामुळे अपघातस्थळी मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच चालकाच्या मागे बसणाऱ्यासही अपघातात हेल्मेट नसल्याने आपला जीव गमवावा लागतो, असे अहवालातून स्पष्ट होते. येत्या एप्रिल महिन्यापासून दुचाकीस्वार चालक आणि मागे बसणाऱ्यासही राज्यातील सर्व रस्त्यांवर हेल्मटसक्ती केली जाईल. अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांतही चालकांना हेल्मेट न वापरल्यामुळे प्राणाला मुकावे लागते, असे देसाई म्हणाले. राज्यात २0१४ साली आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत सर्वाधिक अपघात झाले. एकूण अपघातांपैकी ६८ टक्के अपघात हे सरत्या वर्षाच्या या तीन महिन्यांत होतात, असा अहवाल प्राप्त झाला आहे. २0१३ साली या तीन महिन्यांत एकूण ४0 दुचाकीस्वार व १0 सहप्रवाशांना अपघातांत जीव गमवावा लागला, तर २0१४ सालच्या याच तीन महिन्यांत ३८ दुचाकीस्वार व ५ सहप्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात २0१४ च्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत १७0 अपघात झाले. यात १११ दुचाकीस्वारांना, तर ३७ पादचाऱ्यांना अपघात झाले. उर्वरित जुलै ते डिसेंबर महिन्यांत १२0 अपघात झाले. यात ७८ दुचाकीस्वार, तर ३१ पादचाऱ्यांना अपघात झाल्याचा अहवाल वाहतूक खात्याने दिला आहे. (प्रतिनिधी)