शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

मोबाईल अ‍ॅपद्वारे हॅकर्स तुमचा गेम करू शकतात - हॅरॉल्ड डिकॉस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 22:43 IST

 हॅरॉल्ड डिकॉस्ता हे भारतातील अनेक न्यायालयांच्या संगणकीय व्यवस्थेचे सल्लागार आहेत. 

पणजी: 'धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ या म्हणीची प्रचिती डिजिटलायझेशनच्या या युगात लोकांना येवू लागली आहे. इंटरनेट, ऑनलाईन व्यवहार या गोष्टी व्यवहाराच्या भाग बनत चालल्यामुळे त्या सोडून चालत नाहीत, परंतु या गोष्टी हाताळताना थोडीशी जरी निष्काळजी झाली तर मोठ्या अडचणीत सापडण्याचेही शक्यता असल्याचे  सायबर तज्ज्ञ हॅरॉल्ड डिकॉस्ता सांगतात. चुकीचे  मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केल्यानेही तुमच्या बँक खात्यात हॅकर्स डोकावू शकातात, असे ते सांगतात.  हॅरॉल्ड डिकॉस्ता हे भारतातील अनेक न्यायालयांच्या संगणकीय व्यवस्थेचे सल्लागार आहेत. 

प्रश्न: सायबर सुरक्षेच्या बाबतीत सर्वात मोठा धोका कुठे आहे?हॅरॉल्ड डिकॉस्ता : सोशल मिडियाचा बेजबाबदारपणे होणारा वापर हा पत्कारण्यात आलेला सर्वात मोठा धोका आहे. या साईटवर खाती खोलून लोक आपली छायाचित्रे, जन्मतारीख व इतर सर्व प्रकारची व्यक्तिगत माहिती टाकतात. या माहितीचा वापर करूनही सायबर गुन्हेगार आपल्या बँक खात्यात डोकावू शकतात. असे अनेक प्रकारही घडलेले आहेत. आपली गोपनीय माहिती गोपनीयच राहू द्यावी. 

प्रश्न: सायबर गुन्हेगाराना पकडणे आव्हान का ठरते?हॅरॉल्ड डिकॉस्ता : भारत हा मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. इंटरनेटचा वापर करणारेही देशात सर्वाधिक लोक आहेत. इंटरनेटच्या वापराबद्दल व त्यातील संभाव्य धोक्यांविषयी माहिती नसलेले लोकही त्यात आहेत. त्यामुळे ही गोष्ट धोकादायक ठरू शकते. एकदा फसवणूक झाली की नंतर सायबर गुन्हेगाराचा तपास लावणे खूप कठीण असते. कारण ज्या वेबसाईटचा आपण वापर करतो त्यापैकी बहुतेकांचे सर्व्हर हे विदेशात आहेत. 

प्रश्न: ई-शॉपिंग कितपत सुरक्षित?हॅरॉल्ड डिकॉस्ता : इ शॉपिंग हे खबरदारी घेतल्यास सुरक्षित नपेक्षा केव्हाही धोकादायक ठरू शकते. इशॉपिंग करताना आपल्या वैयक्तीक मोबाईल किंवा संगणकाचा वापर करावा. सार्वजनिक नेटवर्कवर असे व्यवहार करू नयेत. तसेच ओटीपी पद्धतीचे व्यवहार निवडा.  भेदण्यास कठीण असा पासवर्ड ठेवावा. 

प्रश्न: भीम अ‍ॅपचा वापर वाढत आहे. हॅरॉल्ड डिकॉस्ता : होय. भीम अ‍ॅपच्या व्यवहाराला पास कोड, मोबाईल व बँक डिटेल्स व नंतर युपीआय अशी तिहेरी सुरक्षा आहे. त्यामानाने खूप सुरक्षित आहे असे म्हणता येईल. परंतु सर्व प्रकारच्या सुरक्षा या आपल्याच अज्ञानामुळे भेदल्या जाऊ शकतात. विशेषत: मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करताना खबरदारी घेतली पाहिजे.

(मुलाखत: वासुदेव पागी)

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoaगोवा