शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

कचरा प्रकल्प मार्गी लागेना़़़

By admin | Updated: May 20, 2014 01:38 IST

वाळपई : येथील पालिकेच्या कचरा प्रकल्पाचे काम तब्बल पाच वर्षांपासून सुरु आहे़ मात्र, हे काम अद्याप पूर्णत्वास न आल्यामुळे ग्रामस्थांत नाराजीचे वातावरण आहे़

वाळपई : येथील पालिकेच्या कचरा प्रकल्पाचे काम तब्बल पाच वर्षांपासून सुरु आहे़ मात्र, हे काम अद्याप पूर्णत्वास न आल्यामुळे ग्रामस्थांत नाराजीचे वातावरण आहे़ वाळपई पालिकेतर्फे प्रभाग सातमध्ये कचरा प्रकल्पाचे काम पाच वर्षे सुरू आहे. या प्रभागात कचरा प्रकल्प उभारणीसाठी प्रखर विरोध झाला होता, तरीसुद्धा कचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते; पण प्रकल्पाचे काम अगदी संथगतीने सुरू असून येणार्‍या काळात पूर्ण होईल असे दिसत नाही. कचरा प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने कचरा समस्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेच्या नियंत्रणाबाहेर आहे. वाळपई पालिकेला कचरा टाकण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने सध्या पालिका ज्या ठिकाणी प्रकल्प बांधण्यात येत आहे, त्याच ठिकाणी कचरा टाकत आहे. प्रकल्पाचे काम अजून पूर्ण झाले नाही. त्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली नाही, असे असतानादेखील कचरा टाकल्याने त्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडा बाजारच्या दिवशी बाहेरून फेरी घेऊन येणारे शहरात कचरा टाकून जात असतात. तो कचरा कुठे टाकावा याविषयी पालिकेला विचार करावा लागतो. नाईलाजास्तव त्या प्रकल्पातच कचरा टाकावा लागतो. कचरा प्रकल्प लवकरात लवकर उभारावा, असा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर वाळपई पालिकेने स्वत:च्या निधीतून कचरा प्रकल्पाचे काम हाती घेतले. प्रकल्पासाठी निधी उपलब्ध असताना कामास गती मिळण्याची गरत होती; पण सध्या ते बंदच आहे. त्या प्रकल्पाच्या पायाभरणीवेळी अन्य पायाभरणी केलेले प्रकल्प पूर्ण होऊन उद्घाटनसुद्धा झाले; पण कचरा प्रकल्पाचे काम पन्नास टक्केच झाले आहे. प्रकल्पाचे काम करताना योग्य दर्जा राखला नसल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या प्रकल्पावर नगरपालिका अधिकारी योग्यप्रकारे देखरेख करीत नसल्याचे त्या ठिकाणी चाललेल्या कामावरून दिसते.