शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

उत्तीर्ण नको...परीक्षा पद्धतच हवी

By admin | Updated: March 27, 2015 01:30 IST

पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची तरतूद असलेल्या शिक्षण हक्क कायद्याचा गोव्यासाठी फेरआढावा घ्यावा,

पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची तरतूद असलेल्या शिक्षण हक्क कायद्याचा गोव्यासाठी फेरआढावा घ्यावा, अशी मागणी केंद्राकडे पत्र लिहून केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. परीक्षा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी सरकारचीही भूमिका असल्याचे ते म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची लवकरच या बाबतीत आपण भेट घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील दोन दिवसांत केंद्राला पत्र जाईल. गेल्या शनिवारी केंद्रीय मंत्र्यांनी बैठक घेतली, त्यात अन्य १० राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनीही शिक्षण हक्क कायद्याचा फेरआढावा घेण्याची मागणी केलेली आहे. हा कायदा लागू झाल्यापासून गोव्यात वाईट अनुभव आहे. पालकांनाही अशा पद्धतीची व्यवस्था नको आहे, असे पार्सेकर म्हणाले. जिल्हा पंचायतींना स्थैर्य यावे म्हणूनच पक्षीय पातळीवर निवडणूक घेतली, असे पार्सेकर म्हणाले. संगीत खुर्चीचे दुष्परिणाम काय होतात, आम्ही पाहिले आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेतला. झेडपीमध्येही शिस्त यावी हा उद्देश होता. दीनदयाळ पायाभूत सुविधा योजनेखाली ४८ पंचायतींचे प्रस्ताव आले असून अर्थसंकल्पात ३० कोटींची तरतूद केलेली आहे. येत्या एक-दोन महिन्यांत पहिला हप्ता पंचायतींना मिळेल. प्रत्येकी दोन कोटी रुपये दिले जातील. प्रारंभी ३० टक्के रक्कम दिली जाईल. मुख्य माहिती आयुक्त आणि दोन राज्य माहिती आयुक्तांची निवड दोन महिन्यांत केली जाईल. मेपर्यंत हा विषय धसास लावू, असे मुख्यमंत्री म्हणाले. १०८ रुग्णसेवेसाठी १२ नवीन वाहने आलेली आहेत; परंतु कर्मचारी संपावर गेले आहेत. मी दिलेला पर्याय कर्मचाऱ्यांनीच धुडकावला. आणखी एक प्रयत्न वाटाघाटीसाठी करू, असे पार्सेकर म्हणाले. आधीच्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत घ्या, असे व्यवस्थापनाला बजावले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वर्षी पकडलेले ड्रग्स सर्वाधिक होते, असा दावा करून मुख्यमंत्री म्हणाले, की पोलीस सतर्क आहेत. गैर वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू. ७९ महिला पोलीस उपनिरीक्षक व २२१ महिला पोलिसांची स्वतंत्र बटालियन करू, २०१३-१४ या वर्षी ३६ खून झाले. पैकी २९चा तपास लागला. २०१४-१५मध्ये २७ खून झाले, पैकी १८चा छडा लागला. दरोडे १६ वरून ६ पर्यंत खाली आले. चोऱ्या, घरफोड्याही घटल्याचा दावा त्यांनी केला. तीन वर्षांत एकही जातीय हिंसाचार राज्यात घडलेला नाही, असे पार्सेकर म्हणाले. (प्रतिनिधी)