शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

उत्तीर्ण नको...परीक्षा पद्धतच हवी

By admin | Updated: March 27, 2015 01:30 IST

पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची तरतूद असलेल्या शिक्षण हक्क कायद्याचा गोव्यासाठी फेरआढावा घ्यावा,

पणजी : इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची तरतूद असलेल्या शिक्षण हक्क कायद्याचा गोव्यासाठी फेरआढावा घ्यावा, अशी मागणी केंद्राकडे पत्र लिहून केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. परीक्षा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी सरकारचीही भूमिका असल्याचे ते म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची लवकरच या बाबतीत आपण भेट घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील दोन दिवसांत केंद्राला पत्र जाईल. गेल्या शनिवारी केंद्रीय मंत्र्यांनी बैठक घेतली, त्यात अन्य १० राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनीही शिक्षण हक्क कायद्याचा फेरआढावा घेण्याची मागणी केलेली आहे. हा कायदा लागू झाल्यापासून गोव्यात वाईट अनुभव आहे. पालकांनाही अशा पद्धतीची व्यवस्था नको आहे, असे पार्सेकर म्हणाले. जिल्हा पंचायतींना स्थैर्य यावे म्हणूनच पक्षीय पातळीवर निवडणूक घेतली, असे पार्सेकर म्हणाले. संगीत खुर्चीचे दुष्परिणाम काय होतात, आम्ही पाहिले आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेतला. झेडपीमध्येही शिस्त यावी हा उद्देश होता. दीनदयाळ पायाभूत सुविधा योजनेखाली ४८ पंचायतींचे प्रस्ताव आले असून अर्थसंकल्पात ३० कोटींची तरतूद केलेली आहे. येत्या एक-दोन महिन्यांत पहिला हप्ता पंचायतींना मिळेल. प्रत्येकी दोन कोटी रुपये दिले जातील. प्रारंभी ३० टक्के रक्कम दिली जाईल. मुख्य माहिती आयुक्त आणि दोन राज्य माहिती आयुक्तांची निवड दोन महिन्यांत केली जाईल. मेपर्यंत हा विषय धसास लावू, असे मुख्यमंत्री म्हणाले. १०८ रुग्णसेवेसाठी १२ नवीन वाहने आलेली आहेत; परंतु कर्मचारी संपावर गेले आहेत. मी दिलेला पर्याय कर्मचाऱ्यांनीच धुडकावला. आणखी एक प्रयत्न वाटाघाटीसाठी करू, असे पार्सेकर म्हणाले. आधीच्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत घ्या, असे व्यवस्थापनाला बजावले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वर्षी पकडलेले ड्रग्स सर्वाधिक होते, असा दावा करून मुख्यमंत्री म्हणाले, की पोलीस सतर्क आहेत. गैर वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू. ७९ महिला पोलीस उपनिरीक्षक व २२१ महिला पोलिसांची स्वतंत्र बटालियन करू, २०१३-१४ या वर्षी ३६ खून झाले. पैकी २९चा तपास लागला. २०१४-१५मध्ये २७ खून झाले, पैकी १८चा छडा लागला. दरोडे १६ वरून ६ पर्यंत खाली आले. चोऱ्या, घरफोड्याही घटल्याचा दावा त्यांनी केला. तीन वर्षांत एकही जातीय हिंसाचार राज्यात घडलेला नाही, असे पार्सेकर म्हणाले. (प्रतिनिधी)