शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे 'वायनाड' होऊ देऊ नका; डोंगर फोडीबाबत खलप यांनी व्यक्त केल्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2024 15:48 IST

गोव्यात फक्त आज पावसानेच बुडती आली नसून लोकसंख्येनेही गोवा बुडून गेला आहे. यात कोकणी सोबत मराठी भाषाही बुडून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गोव्यात जमिनींचे मोठ्या प्रमाणावर रूपांतर सुरू आहे. डोंगर कापणी सुरू आहे. बाहेरच्या लोकांना जमिनींची विक्री केली जात आहे. त्यातून बिगर गोवेकरांची संख्या चिंताजनकरित्या वाढली आहे. त्यात भर म्हणून भाषिक वाद सुरू करण्यात आला आहे. गोव्यात वायनाडसारख्या उद्भवलेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या भावीपिढीच्या हितासाठी गोवेकरांनी जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी भाषिक वादाला विरोध करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री, तसेच ज्येष्ठ साहित्यिक अॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले आहे.

गोव्यात फक्त आज पावसानेच बुडती आली नसून लोकसंख्येनेही गोवा बुडून गेला आहे. यात कोकणी सोबत मराठी भाषाही बुडून गेली आहे. गोव्याची संस्कृती नष्ट झाली आहे. या गर्दीत गोवेकर बुडून गेला आहे. या संकटावर आता नवा भाषिक वाद आणले जात आहे. पूर्वी महाराष्ट्रात गोव्याचे विलीनीकरण झाल्यास गोव्याच्या अस्तित्वाला धोका आहे, असे म्हणणारे लोक आज या कठीण प्रसंगी कुठे आहेत. त्यावेळी जर तुम्हाला विलीनीकरणाची भीती दिसत होती, तर आता आलेल्या संकटांची भीती का वाटत नाही असाही प्रश्न खलप यांनी केला.

मराठी कोकणी वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला भविष्यातील गोव्याची चिंता वाटू लागली आहे. जमिनी विक्रीवर निर्बंध लागू करणारा कायदा हवा. एखाद्यावेळी जमीन विक्री करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या संबंधीचा पहिला अधिकार सरकारने आपल्याकडे राखून ठेवावा, असेही यावेळी खलप यांनी बोलताना सांगितले.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज 

गोव्याची मुंबई, सिंगापूर या दिशेने वाटचाल सुरू असल्याने या गंभीर प्रश्नाकडे गोवेकरांचे लक्ष वेधण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. गोवेकरांचे भवितव्य गोव्यातील वारसा सांभाळणे हे प्रत्येक विद्यमान लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असल्याचे खलप म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस