शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गोव्याचे 'वायनाड' होऊ देऊ नका; डोंगर फोडीबाबत खलप यांनी व्यक्त केल्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2024 15:48 IST

गोव्यात फक्त आज पावसानेच बुडती आली नसून लोकसंख्येनेही गोवा बुडून गेला आहे. यात कोकणी सोबत मराठी भाषाही बुडून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गोव्यात जमिनींचे मोठ्या प्रमाणावर रूपांतर सुरू आहे. डोंगर कापणी सुरू आहे. बाहेरच्या लोकांना जमिनींची विक्री केली जात आहे. त्यातून बिगर गोवेकरांची संख्या चिंताजनकरित्या वाढली आहे. त्यात भर म्हणून भाषिक वाद सुरू करण्यात आला आहे. गोव्यात वायनाडसारख्या उद्भवलेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या भावीपिढीच्या हितासाठी गोवेकरांनी जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी भाषिक वादाला विरोध करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री, तसेच ज्येष्ठ साहित्यिक अॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले आहे.

गोव्यात फक्त आज पावसानेच बुडती आली नसून लोकसंख्येनेही गोवा बुडून गेला आहे. यात कोकणी सोबत मराठी भाषाही बुडून गेली आहे. गोव्याची संस्कृती नष्ट झाली आहे. या गर्दीत गोवेकर बुडून गेला आहे. या संकटावर आता नवा भाषिक वाद आणले जात आहे. पूर्वी महाराष्ट्रात गोव्याचे विलीनीकरण झाल्यास गोव्याच्या अस्तित्वाला धोका आहे, असे म्हणणारे लोक आज या कठीण प्रसंगी कुठे आहेत. त्यावेळी जर तुम्हाला विलीनीकरणाची भीती दिसत होती, तर आता आलेल्या संकटांची भीती का वाटत नाही असाही प्रश्न खलप यांनी केला.

मराठी कोकणी वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला भविष्यातील गोव्याची चिंता वाटू लागली आहे. जमिनी विक्रीवर निर्बंध लागू करणारा कायदा हवा. एखाद्यावेळी जमीन विक्री करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या संबंधीचा पहिला अधिकार सरकारने आपल्याकडे राखून ठेवावा, असेही यावेळी खलप यांनी बोलताना सांगितले.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज 

गोव्याची मुंबई, सिंगापूर या दिशेने वाटचाल सुरू असल्याने या गंभीर प्रश्नाकडे गोवेकरांचे लक्ष वेधण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. गोवेकरांचे भवितव्य गोव्यातील वारसा सांभाळणे हे प्रत्येक विद्यमान लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असल्याचे खलप म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस