शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

गोव्याचे 'वायनाड' होऊ देऊ नका; डोंगर फोडीबाबत खलप यांनी व्यक्त केल्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2024 15:48 IST

गोव्यात फक्त आज पावसानेच बुडती आली नसून लोकसंख्येनेही गोवा बुडून गेला आहे. यात कोकणी सोबत मराठी भाषाही बुडून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गोव्यात जमिनींचे मोठ्या प्रमाणावर रूपांतर सुरू आहे. डोंगर कापणी सुरू आहे. बाहेरच्या लोकांना जमिनींची विक्री केली जात आहे. त्यातून बिगर गोवेकरांची संख्या चिंताजनकरित्या वाढली आहे. त्यात भर म्हणून भाषिक वाद सुरू करण्यात आला आहे. गोव्यात वायनाडसारख्या उद्भवलेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या भावीपिढीच्या हितासाठी गोवेकरांनी जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी भाषिक वादाला विरोध करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री, तसेच ज्येष्ठ साहित्यिक अॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले आहे.

गोव्यात फक्त आज पावसानेच बुडती आली नसून लोकसंख्येनेही गोवा बुडून गेला आहे. यात कोकणी सोबत मराठी भाषाही बुडून गेली आहे. गोव्याची संस्कृती नष्ट झाली आहे. या गर्दीत गोवेकर बुडून गेला आहे. या संकटावर आता नवा भाषिक वाद आणले जात आहे. पूर्वी महाराष्ट्रात गोव्याचे विलीनीकरण झाल्यास गोव्याच्या अस्तित्वाला धोका आहे, असे म्हणणारे लोक आज या कठीण प्रसंगी कुठे आहेत. त्यावेळी जर तुम्हाला विलीनीकरणाची भीती दिसत होती, तर आता आलेल्या संकटांची भीती का वाटत नाही असाही प्रश्न खलप यांनी केला.

मराठी कोकणी वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला भविष्यातील गोव्याची चिंता वाटू लागली आहे. जमिनी विक्रीवर निर्बंध लागू करणारा कायदा हवा. एखाद्यावेळी जमीन विक्री करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या संबंधीचा पहिला अधिकार सरकारने आपल्याकडे राखून ठेवावा, असेही यावेळी खलप यांनी बोलताना सांगितले.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज 

गोव्याची मुंबई, सिंगापूर या दिशेने वाटचाल सुरू असल्याने या गंभीर प्रश्नाकडे गोवेकरांचे लक्ष वेधण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. गोवेकरांचे भवितव्य गोव्यातील वारसा सांभाळणे हे प्रत्येक विद्यमान लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असल्याचे खलप म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस