शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

कोकणीसमोर शिक्षण माध्यमाची अडचण

By admin | Updated: July 9, 2014 01:05 IST

पणजी : कोकणीची चळवळ संघटितदृष्ट्या ७५ वर्षांची झाली तरीही कोकणी अकादमीला गोव्यात जागा नाही, हे गोमंतकीयांचे दुर्दैव आहे. सरकारने कोकणी भाषेसमोर

पणजी : कोकणीची चळवळ संघटितदृष्ट्या ७५ वर्षांची झाली तरीही कोकणी अकादमीला गोव्यात जागा नाही, हे गोमंतकीयांचे दुर्दैव आहे. सरकारने कोकणी भाषेसमोर शिक्षणाच्या माध्यम प्रश्नाद्वारे मोठी अडचण निर्माण करून ठेवली आहे. देशी भाषांना डावलून विदेशी भाषेला अभय देणारे शिक्षण धोरण चुकीचे आहे आणि ते बंद होण्याची आवश्यकता आहे, असे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व कवी नागेश करमली यांनी सांगितले. अखिल भारतीय कोकणी परिषदेने कला व संस्कृती भवनाच्या सभागृहात आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात करमली बोलत होते. ‘कोंकणीचो फुडार आनी म्हजें योगदान’ या विषयावर ते बोलत होते. करमली म्हणाले, शिक्षणाचे माध्यम कोकणी असावे म्हणून केलेल्या चळवळीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सहभागी होते. भाजपाला सत्ता मिळाल्यास कोकणीला प्रथम स्थान देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले होते; पण माध्यमप्रश्नी वेगळी शक्कल लढवून समाजाचे तुकडे करण्याचे कारस्थान सरकारने केले आहे. कोकणीचे भविष्य नव्या पिढीच्या हातात असून त्यांनी पुढाकार घेतल्यास येणाऱ्या काळात गोवा कोकणीमय होईल. प्रशासकीय कामकाजही कोकणीत होण्याची गरज आहे. तसेच शहर आणि गावांची नावे बदलण्याचा विचारही शासकीय पातळीवरून व्हायला हवा. हल्लीच्या काळात बरीच युवा मंडळी कोकणी भाषेसाठी कार्यरत असल्याचे दिसते. दरम्यान, कॉलेज विद्यार्थ्यांनीही ‘कोकणीच्या भविष्यासाठी आपले योगदान’ या विषयावर मते मांडली. यात प्रामुख्याने कोकणी भाषा प्रशासकीय कामकाजात येणे गरजेचे आहे, इंटरनेटवरही कोकणी भाषा असावी, राज्यात कोकणी विषयाचे डी.एड कॉलेज असावे, कार्यालयातील फलकांबरोबरच गावांचे, वाहतुकीचे फलकही पहिली कोकणी व इतर भाषेतून असावेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, कोकणी भाषेच्या विकासासाठी कार्य केलेल्या माजी अध्यक्षांचा या वेळी प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ सुरेश आमोणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात उदय भेंब्रे, दामोदर मावजो, गुरुनाथ केळकर, अ‍ॅडविन डिसोझा, नागेश करमली, शीला कोळंबकर, गोकुळदास प्रभू, महाबळेश्वर सैल, रमेश वेळुस्कर, मीना काकोडकर, आर. एस. भास्कर, पुंडलिक नायक, तानाजी हळर्णकर, बस्ती वामन शणै, पॉल मोराज, शांताराम नाईक, डॉ. एच. शांताराम, अरविंद भाटीकर यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समारोप सोहळ््याच्या अध्यक्षीय भाषणात आमोणकर म्हणाले, जागतिकीकरणामुळे विदेशी भाषा अतित्वाला बाधक असल्याचे दिसून येते. आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीशी एकरूप होत चालली आहे. त्यांना यापासून रोखण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण योग्य उपाय ठरेल. भारतीय संस्कृतीची ओळख नव्या पिढीत, युवा पिढीला असायला हवी असे वाटत असल्यास मातृभाषेविना पर्याय नाही. परिषदेने दूर गेलेल्या कोकणी भाषाप्रेमींना एकत्र आणण्याची योजना आखावी. यामुळे कोकणीच्या विकासकार्याला बळ मिळेल. समारोप सोहळ््याची प्रस्तावना उषा राणे यांनी केली, तर आभार सुनीता काणेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)