शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

कोकणीसमोर शिक्षण माध्यमाची अडचण

By admin | Updated: July 9, 2014 01:05 IST

पणजी : कोकणीची चळवळ संघटितदृष्ट्या ७५ वर्षांची झाली तरीही कोकणी अकादमीला गोव्यात जागा नाही, हे गोमंतकीयांचे दुर्दैव आहे. सरकारने कोकणी भाषेसमोर

पणजी : कोकणीची चळवळ संघटितदृष्ट्या ७५ वर्षांची झाली तरीही कोकणी अकादमीला गोव्यात जागा नाही, हे गोमंतकीयांचे दुर्दैव आहे. सरकारने कोकणी भाषेसमोर शिक्षणाच्या माध्यम प्रश्नाद्वारे मोठी अडचण निर्माण करून ठेवली आहे. देशी भाषांना डावलून विदेशी भाषेला अभय देणारे शिक्षण धोरण चुकीचे आहे आणि ते बंद होण्याची आवश्यकता आहे, असे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व कवी नागेश करमली यांनी सांगितले. अखिल भारतीय कोकणी परिषदेने कला व संस्कृती भवनाच्या सभागृहात आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात करमली बोलत होते. ‘कोंकणीचो फुडार आनी म्हजें योगदान’ या विषयावर ते बोलत होते. करमली म्हणाले, शिक्षणाचे माध्यम कोकणी असावे म्हणून केलेल्या चळवळीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सहभागी होते. भाजपाला सत्ता मिळाल्यास कोकणीला प्रथम स्थान देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले होते; पण माध्यमप्रश्नी वेगळी शक्कल लढवून समाजाचे तुकडे करण्याचे कारस्थान सरकारने केले आहे. कोकणीचे भविष्य नव्या पिढीच्या हातात असून त्यांनी पुढाकार घेतल्यास येणाऱ्या काळात गोवा कोकणीमय होईल. प्रशासकीय कामकाजही कोकणीत होण्याची गरज आहे. तसेच शहर आणि गावांची नावे बदलण्याचा विचारही शासकीय पातळीवरून व्हायला हवा. हल्लीच्या काळात बरीच युवा मंडळी कोकणी भाषेसाठी कार्यरत असल्याचे दिसते. दरम्यान, कॉलेज विद्यार्थ्यांनीही ‘कोकणीच्या भविष्यासाठी आपले योगदान’ या विषयावर मते मांडली. यात प्रामुख्याने कोकणी भाषा प्रशासकीय कामकाजात येणे गरजेचे आहे, इंटरनेटवरही कोकणी भाषा असावी, राज्यात कोकणी विषयाचे डी.एड कॉलेज असावे, कार्यालयातील फलकांबरोबरच गावांचे, वाहतुकीचे फलकही पहिली कोकणी व इतर भाषेतून असावेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, कोकणी भाषेच्या विकासासाठी कार्य केलेल्या माजी अध्यक्षांचा या वेळी प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ सुरेश आमोणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात उदय भेंब्रे, दामोदर मावजो, गुरुनाथ केळकर, अ‍ॅडविन डिसोझा, नागेश करमली, शीला कोळंबकर, गोकुळदास प्रभू, महाबळेश्वर सैल, रमेश वेळुस्कर, मीना काकोडकर, आर. एस. भास्कर, पुंडलिक नायक, तानाजी हळर्णकर, बस्ती वामन शणै, पॉल मोराज, शांताराम नाईक, डॉ. एच. शांताराम, अरविंद भाटीकर यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समारोप सोहळ््याच्या अध्यक्षीय भाषणात आमोणकर म्हणाले, जागतिकीकरणामुळे विदेशी भाषा अतित्वाला बाधक असल्याचे दिसून येते. आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीशी एकरूप होत चालली आहे. त्यांना यापासून रोखण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण योग्य उपाय ठरेल. भारतीय संस्कृतीची ओळख नव्या पिढीत, युवा पिढीला असायला हवी असे वाटत असल्यास मातृभाषेविना पर्याय नाही. परिषदेने दूर गेलेल्या कोकणी भाषाप्रेमींना एकत्र आणण्याची योजना आखावी. यामुळे कोकणीच्या विकासकार्याला बळ मिळेल. समारोप सोहळ््याची प्रस्तावना उषा राणे यांनी केली, तर आभार सुनीता काणेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)