शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अधिकाऱ्यांच्या तब्बल १६४ जागा रिक्त; १२२ जणांकडे अतिरिक्त ताबा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 09:44 IST

३१ अधिकारी मुदतवाढीवर, ९२ कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :राज्य सरकारच्या नागरी प्रशासनात कनिष्ठ व ज्येष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या तब्बल १६४ जागा रिक्त आहेत. १४ मामलेदारांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे ही पदे न भरता १२२ अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदांचा ताबा दिलेला आहे तर ३१ अधिकाऱ्यांना सेवेत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांच्या प्रश्नाला मिळालेल्या लेखी उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांची पदे एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने त्याचा परिणाम सरकारी कामकाजावरही होणे स्वाभाविक आहे. अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त पदे असल्यास तो कामाला न्याय देऊ शकत नाही. ३१ अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जलस्रोत खात्याचे अभियंता प्रमोद बदामी हे ३१ मे २०२२ रोजी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर तसेच नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. तांत्रिकी शिक्षण खात्याचे संचालक विवेक कामत, डिचोली येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष बोरकर यांनाही दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची तब्बल ९२ पदे रिक्त आहेत. यात उपजिल्हाधिकारी, उपसंचालक, अवर सचिव आदी पदांचा समावेश आहे. ज्येष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची ३ पदे रिक्त आहेत. पोलिस अधिक्षक जे ज्येष्ठ श्रेणीत गणले जातात त्यांची १० पदे तर उपाधीक्षक, जे कनिष्ठ श्रेणीत गणले जातात त्यांची ३७ पदे रिक्त आहेत.

१२२ अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त ताबा आहे. यात संजित रॉड्रिग्स (नागरी पुरवठा सचिव व स्मार्ट सिटी सीईओ), पुंडलिक खोर्जुवेकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी, उत्तर व कदंबचे एमडी), गुरुदास देसाई (राज्य निबंधक व मनुष्यबळ विकास महामंडळ एमडी), अंकित यादव (विज्ञान-तंत्रज्ञान संचालक व कचरा व्यवस्थापन महामंडळ एमडी), अरविंद खुटकर (क्रीडा व युवा व्यवहार संचालक व कला अकादमी सदस्य सचिव), स्टिफन फर्नांडिस आदींचा समावेश आहे.

निवड आयोगाने भरली ३८७ पदे

सरकारी खात्यांमध्ये आता सर्व 'क' श्रेणी पदे राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फतच भरती केली जात आहे. केपेंचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या अन्य एका प्रश्नाला मिळालेल्या लेखी उत्तरातून असे स्पष्ट झाले आहे की, आयोगाने स्थापनेपासून आतापर्यंत ३८७ पदांवर भरती केली. गेल्या वर्षी ३० सरकारी खात्यांनी रिक्त जागा भरण्यासाठी आयोगाकडे संपर्क साधला. यात प्रामुख्याने वीज, पर्यटन, दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालय, वाहतूक, उच्च शिक्षण विभाग, पोलिस दल, क्रीडा व युवा व्यवहार खाते, लेखा संचालनालय, पशु संवर्धन, मच्छिमारी आदी खात्यांचा समावेश आहे. आयोगाने अलीकडेच कनिष्ठ लिपीक, वसुली कारकूनांची २३२ पदे भरली आहेत.

मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन हे प्रकार बंद करण्याची मागणी करणार आहोत. यापूर्वीही एक निवेदन आम्ही दिलेले आहे. चार चारवेळा मुदतवाढ देणे हे अति झाले. राजपत्रित अधिकारी संघटनेनेही आमच्यासोबत येऊन या प्रकारांना एकत्रितपणे विरोध करायला हवा. अधिकाऱ्यांना सेवेत मुदतवाढ दिल्याने बढतीसाठी पात्र असलेल्या इतर अधिकाऱ्यांवर अन्याय होतो. - अभय मांद्रेकर, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार