शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अधिकाऱ्यांच्या तब्बल १६४ जागा रिक्त; १२२ जणांकडे अतिरिक्त ताबा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 09:44 IST

३१ अधिकारी मुदतवाढीवर, ९२ कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :राज्य सरकारच्या नागरी प्रशासनात कनिष्ठ व ज्येष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या तब्बल १६४ जागा रिक्त आहेत. १४ मामलेदारांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे ही पदे न भरता १२२ अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदांचा ताबा दिलेला आहे तर ३१ अधिकाऱ्यांना सेवेत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांच्या प्रश्नाला मिळालेल्या लेखी उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांची पदे एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने त्याचा परिणाम सरकारी कामकाजावरही होणे स्वाभाविक आहे. अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त पदे असल्यास तो कामाला न्याय देऊ शकत नाही. ३१ अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जलस्रोत खात्याचे अभियंता प्रमोद बदामी हे ३१ मे २०२२ रोजी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर तसेच नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. तांत्रिकी शिक्षण खात्याचे संचालक विवेक कामत, डिचोली येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष बोरकर यांनाही दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची तब्बल ९२ पदे रिक्त आहेत. यात उपजिल्हाधिकारी, उपसंचालक, अवर सचिव आदी पदांचा समावेश आहे. ज्येष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची ३ पदे रिक्त आहेत. पोलिस अधिक्षक जे ज्येष्ठ श्रेणीत गणले जातात त्यांची १० पदे तर उपाधीक्षक, जे कनिष्ठ श्रेणीत गणले जातात त्यांची ३७ पदे रिक्त आहेत.

१२२ अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त ताबा आहे. यात संजित रॉड्रिग्स (नागरी पुरवठा सचिव व स्मार्ट सिटी सीईओ), पुंडलिक खोर्जुवेकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी, उत्तर व कदंबचे एमडी), गुरुदास देसाई (राज्य निबंधक व मनुष्यबळ विकास महामंडळ एमडी), अंकित यादव (विज्ञान-तंत्रज्ञान संचालक व कचरा व्यवस्थापन महामंडळ एमडी), अरविंद खुटकर (क्रीडा व युवा व्यवहार संचालक व कला अकादमी सदस्य सचिव), स्टिफन फर्नांडिस आदींचा समावेश आहे.

निवड आयोगाने भरली ३८७ पदे

सरकारी खात्यांमध्ये आता सर्व 'क' श्रेणी पदे राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फतच भरती केली जात आहे. केपेंचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या अन्य एका प्रश्नाला मिळालेल्या लेखी उत्तरातून असे स्पष्ट झाले आहे की, आयोगाने स्थापनेपासून आतापर्यंत ३८७ पदांवर भरती केली. गेल्या वर्षी ३० सरकारी खात्यांनी रिक्त जागा भरण्यासाठी आयोगाकडे संपर्क साधला. यात प्रामुख्याने वीज, पर्यटन, दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालय, वाहतूक, उच्च शिक्षण विभाग, पोलिस दल, क्रीडा व युवा व्यवहार खाते, लेखा संचालनालय, पशु संवर्धन, मच्छिमारी आदी खात्यांचा समावेश आहे. आयोगाने अलीकडेच कनिष्ठ लिपीक, वसुली कारकूनांची २३२ पदे भरली आहेत.

मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन हे प्रकार बंद करण्याची मागणी करणार आहोत. यापूर्वीही एक निवेदन आम्ही दिलेले आहे. चार चारवेळा मुदतवाढ देणे हे अति झाले. राजपत्रित अधिकारी संघटनेनेही आमच्यासोबत येऊन या प्रकारांना एकत्रितपणे विरोध करायला हवा. अधिकाऱ्यांना सेवेत मुदतवाढ दिल्याने बढतीसाठी पात्र असलेल्या इतर अधिकाऱ्यांवर अन्याय होतो. - अभय मांद्रेकर, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार