शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

राज्यात यंदा २५ हजार ८०० टन काजू उत्पादन; उत्पादनात वाढ, विविध योजनांचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:04 IST

राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी कृषी खात्याकडून विविध सवलती, अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात काजू उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यंदा २५ हजार ८०० टन काजू उत्पादन झाले आहे. यात सर्वाधिक उत्पादन सत्तरी तालुक्यात झाले आहे. सत्तरीत ५ हजार ६४५ टन काजू उत्पादन झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात लेखी उत्तरात दिली आहे.

राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी कृषी खात्याकडून विविध सवलती, अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. काजू रोपटे, खत खरेदीसाठी अनुदान दिले जाते. रोपटी लावण्यासाठीही कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दिले जात आहे. त्याचप्रमाणे आता काजू बियांवर आधारभूत किमतीही दिली जात आहे. या अनेक कारणांमुळे यंदा काजू उत्पादन वाढल्याचे मंत्री नाईक यांनी म्हटले आहे.

राज्यात इतर उत्पादनांपेक्षा काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. गोव्याचा काजूगर जगप्रसिद्ध असल्याने पर्यटकांचा तो आवडीचा आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तीन महिन्यांच्या काजू हंगामावर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी उदरनिर्वाह करतात.

काजू उत्पादन टनात

तिसवाडी १५७५बार्देश २८१९सत्तरी ५६४५फोंडा १६१८केपे ११३७पेडणे ३३५६सांगे १८२१सासष्टी ९९७डिचोली ३६००धारबांदोडा ११३९काणकोण१९००मुरगाव १९३

 

टॅग्स :goaगोवा