शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

राज्यात यंदा २५ हजार ८०० टन काजू उत्पादन; उत्पादनात वाढ, विविध योजनांचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:04 IST

राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी कृषी खात्याकडून विविध सवलती, अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात काजू उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यंदा २५ हजार ८०० टन काजू उत्पादन झाले आहे. यात सर्वाधिक उत्पादन सत्तरी तालुक्यात झाले आहे. सत्तरीत ५ हजार ६४५ टन काजू उत्पादन झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात लेखी उत्तरात दिली आहे.

राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी कृषी खात्याकडून विविध सवलती, अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. काजू रोपटे, खत खरेदीसाठी अनुदान दिले जाते. रोपटी लावण्यासाठीही कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दिले जात आहे. त्याचप्रमाणे आता काजू बियांवर आधारभूत किमतीही दिली जात आहे. या अनेक कारणांमुळे यंदा काजू उत्पादन वाढल्याचे मंत्री नाईक यांनी म्हटले आहे.

राज्यात इतर उत्पादनांपेक्षा काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. गोव्याचा काजूगर जगप्रसिद्ध असल्याने पर्यटकांचा तो आवडीचा आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तीन महिन्यांच्या काजू हंगामावर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी उदरनिर्वाह करतात.

काजू उत्पादन टनात

तिसवाडी १५७५बार्देश २८१९सत्तरी ५६४५फोंडा १६१८केपे ११३७पेडणे ३३५६सांगे १८२१सासष्टी ९९७डिचोली ३६००धारबांदोडा ११३९काणकोण१९००मुरगाव १९३

 

टॅग्स :goaगोवा