शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मागील वर्षीएवढा पाऊस यावर्षी पडणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

देसाईगंज तालुक्यातील खरीप धान पीक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. धान पिकाला भरपूर पाणी आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी पडलेला पाऊस आणि पावसाचे दिवस यात समानता नाही. पाऊस जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पडल्यास पेरणी, कापणी वेळेवर होत असते. परंतु, गेल्या पाच वर्षांत पाऊस पडण्यात अनियमितता दिसून येते. 

लाेकमत न्यूज  नेटवर्कदेसाईगंज : २०१७ ते २०२१ पर्यंतच्या पाच वर्षांतील पावसाच्या आकडेवारीनुसार देसाईगंज तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १४१०.२ मिलिमीटर आहे. मागील वर्षीएवढा पाऊस यावर्षी पडणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  देसाईगंज तालुक्यातील खरीप धान पीक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. धान पिकाला भरपूर पाणी आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी पडलेला पाऊस आणि पावसाचे दिवस यात समानता नाही. पाऊस जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पडल्यास पेरणी, कापणी वेळेवर होत असते. परंतु, गेल्या पाच वर्षांत पाऊस पडण्यात अनियमितता दिसून येते. हंगामात मोजके दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्याने पिकावर प्रतिकूल प्रभाव पडत आहे. पेरणी झाल्यावर पाऊस पडला नाही तर धान नर्सरी करपून दुबार, तिबार पेरणीचे संकट येते. मागील वर्षी मृग नक्षत्राच्या प्रत्येक दिवशी पाऊस आला. आर्द्राच्या अखेर पाऊस पडल्याने चिखलात पेरणी सुरू झाली. मात्र, मध्यंतरी ऐन रोवणीच्या वेळी मोठी धावपळ करावी लागली. पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा हे चारही नक्षत्र बहुतेक कोरडे गेले. अखेर पूर्वा आणि उत्तराने उत्तम साथ दिल्याने धान पीक तरले. जलसाठे पण भरले. परंतु, ऑक्टोबर महिन्यापर्यंत चाललेल्या पावसाने कापणीच्या वेळेस धान पिकाची फारच कठीण परिस्थिती निर्माण केली होती. यावर्षी हवामान खात्यानी पावसाचे प्रमाण भरपूर राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरला तर काेरड्या दुष्काळाचे संकट निर्माण हाेणार नाही. एवढे मात्र निश्चित.

२०१७ मध्ये पडला केवळ ५८ टक्के पाऊस -    देसाईगंज तालुक्यात २०१७ ते २०२१ या पाच वर्षांत पडलेल्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास सन २०१९ ला सर्वाधिक १८३९.६ मिलिमीटर, वर्ष २०१७ मध्ये सर्वांत कमी ९११.६  मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी ६९ दिवस पडलेल्या पावसाचे एकूण पर्जन्यमान १३१३ मिमी म्हणजेच ९३.११ टक्के होते. गेल्या पाच वर्षामध्ये प्रत्येक वर्षी पडलेल्या पावसाच्या दिवसांचा विचार केल्यास वर्ष २०१९ मध्येच सर्वांत जास्त ७५ दिवस, तर वर्ष २०१८ मध्ये केवळ ४९ दिवस पाऊस पडला.

हलक्या व मध्यम जातीच्या वाणाला पसंती-    गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान कमी आहे. हा अनुभव पाहता, काही शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात हलक्या व मध्यम जातीच्या अर्थात कमी मुदतीच्या धानाच्या वाणाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. -    कृष विभागाचे कार्यालय तसेच विविध ठिकाणच्या कृषी केंद्रात जाऊन धान पिकाच्या वाणाबाबत आत्तापासूनच माहिती जाणून घेत आहेत. कमी मुदतीचे व भरपूर उत्पादन देणाऱ्या वाणांची आर्डर दिली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती