शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जिल्ह्यात जनजागृतीने वन्यजीव सप्ताहाचा समारोप

By admin | Updated: October 11, 2015 02:33 IST

जिल्ह्यात वन विभाग व शाळा, महाविद्यालयाच्या वतीने १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

ठिकठिकाणी मार्गदर्शन : आरमोरी, अहेरी येथे महाविद्यालयात कार्यक्रम व वृक्षारोपण; क्षेत्र भेटीतून सांगितले महत्त्वगडचिरोली : जिल्ह्यात वन विभाग व शाळा, महाविद्यालयाच्या वतीने १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहादरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करून समारोप करण्यात आला. आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या विज्ञान मंच पर्यावरण अभ्यास समिती व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित वन्यजीव सप्ताहाचा सामारोप गुरूवारी करण्यात आला. प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान मंच प्रमुख प्रा. गंगाधर जुआरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयेश पापडकर, वनस्पतिशास्त्राचे प्रा. डॉ. वसंता कहालकर, पर्यावरण समिती प्रमुख प्रा. सत्येंद्र सोनटक्के, प्रा. डॉ. राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. जैवविविधता व प्राण्यांची वांशिकता अबाधित राखण्यासाठी प्राणिमात्रांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कहालकर यांनी केले. दरम्यान प्रा. गंगाधर जुआरे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सोनटक्के यांनी पर्यावरणाच्या संरक्षणात वन्यप्राण्यांची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेंद्र चव्हाण तर अभार गायत्री लोणारे हिने मानले. यशस्वीतेसाठी लक्ष्मण निमजे, सचिन ठाकरे, प्रशांत दडमल यांनी सहकार्य केले. अहेरी : येथील एस. बी. महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचा सामारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. नागसेन मेश्राम, प्रा. पद्मनाभ तुंडुलवार उपस्थित होते. सप्ताहाच्या निमित्ताने हनुमान टेकडी परिसरातील परिक्षेत्रात कृतिमय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वन्यजीवात समाविष्ट मांसभक्ष्यी प्राणी, तृणभक्ष्यी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, किडे यांच्या साखळीबाबत सांगण्यात आले. अन्नसाखळीतील प्रत्येक प्राणी महत्त्वाचा असून प्राण्यांचे अस्तित्व दिवसेंदिवस नामशेष होत आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. तालुक्यातील मोसम येथे ग्राम पंचायत देवलमरी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त गावातील १०० कुटुंबांमार्फत प्रत्येकी पाच वृक्षांचे याप्रमाणे एकूण ५०० रोपांचे रोपण रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आले. करंज, सिसू, गुलमोहर आदींसह विविध प्रजातींच्या रोपांची लागवड यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला देवलमरी ग्रा. पं. च्या सरपंच पेंट्रताई पोरतेट, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास राऊत, सचिव वनरक्षक सी. व्ही. सडमेक, देवलमरी ग्राम पंचायतीचे सचिव एन. एम. झेंडे, उपसरपंच गजानन मडावी व वनव्यवस्थापन समितीचे तसेच ग्राम पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (लोकमत वृत्तसेवा)