शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

धानाचा बाेनस कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत आधारभूत किमतीने धान खरेदी केले जाते. यावर्षी शासनाने सर्वसाधारण धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८६८ रुपये तर चांगल्या प्रतीच्या धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८८८ रुपये एवढी आधारभूत किंमत जाहीर केली. त्याचबराेबर खरिपाच्या धानासाठी प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर केला आहे. 

ठळक मुद्देखते, बियाणांसाठी काढावे लागतेय कर्ज; चार महिन्यांचा कालावधी उलटूनही रक्कम मिळेना

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही खरिपाचे धान विकलेल्या शेतकऱ्यांना बाेनसची रक्कम मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी धान विकून आता सहा महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. तरीही बाेनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे बाेनसची रक्कम कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत आधारभूत किमतीने धान खरेदी केले जाते. यावर्षी शासनाने सर्वसाधारण धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८६८ रुपये तर चांगल्या प्रतीच्या धानासाठी प्रति क्विंटल १ हजार ८८८ रुपये एवढी आधारभूत किंमत जाहीर केली. त्याचबराेबर खरिपाच्या धानासाठी प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर केला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळामार्फत ५६ हजार ९८९ शेतकऱ्यांकडून १६ लाख ६१ हजार ७६० क्विंटल धान खरेदी केले. या धानाची किंमत ३१० काेटी ४१ लाख ६७ हजार ९२२ रूपये एवढी हाेते. त्यावर पुन्हा प्रति क्विंटल बाेनस द्यायचा आहे. बाेनसची रक्कम ११६ काेटी ३२ लाख ३२ हजार एवढी हाेते. सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या खात्यात १८६८ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे धानाची रक्क्म जमा केली जाते. त्यानंतर काही दिवसांनी धानाच्या बाेनसची रक्कम दिली जाते. खरिपाचे धान ३१ मार्चपर्यंतच खरेदी केले जातात. त्यानंतर धान खरेदी बंद केली जाते. हिशेब पूर्ण झाल्यानंतर बाेनसची रक्कम जवळपास मे महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात हाेती. यावर्षी मात्र जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना अजूनही बाेनची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. 

शेतीसाठी उपयाेगात आला असता पैसाशेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणी, किटकनाशके खरेदी करावी लागतात. तसेच शेतीच्या मशागतीसाठी बराच खर्च होतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत असल्याने त्याला पैशाची गरज राहते. अशावेळी धानाच्या बाेनसची रक्कम मिळेल अशी आशा शेतकरी बाळगून हाेता. मात्र, अजूनही बाेनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कर्ज काढावे लागत आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या शेवटी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात बाेनसची रक्कम जमा झाली हाेती. यावर्षी मात्र अजूनही रक्कम मिळाली नाही. 

प्रत्येक शेतकऱ्याचे किमान ५० क्विंटल धान खरेदी केले जाते. त्या धानाची  ७०० रुपये प्रमाणे ३५ हजार रुपये एवढी रक्कम हाेते. एवढी रक्कम मिळाली असती तर कर्ज काढण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली नसती. 

 

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड