शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

1095 शेतकऱ्यांंच्या शेतात पाेहाेचले साैरकृषिपंपाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

सिंचन विहीरी, शेततळे, बंधारे यांच्या माध्यमातून शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र पाण्याचा उपसा हाेण्यासाठी साधन असने आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून कृषी पंपासाठी विज जाेडणी दिली जात हाेती. काही शेतकऱ्यांचे शेत मुख्य वीज वाहिनीपासून बऱ्याच दूर अंतरावर राहत असल्याने वीज जाेडणी देणे शक्य हाेत नाही. तसेच बरीचशी वीज कृषी पंपांसाठी वापरली जाते.

ठळक मुद्देचांगला प्रतिसाद; ९० टक्के अनुदानावर उपलब्ध हाेते साधनसामग्री

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : वीज वापराचा खर्च वाचावा त्याचबराेबर वीज वाहिनी गेलेली नसलेल्या शेतकऱ्यालाही पंप मिळावा यासाठी साैरकृषीपंप देण्याची याेजना शासनाने तीन वर्षांपूर्वी सुरू केली हाेती. एक वर्ष या याेजनेचे नियाेजन करण्यातच गेले. त्यानंतर मागील वर्षीपासून साैरकृषीपंप लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून जिल्हाभरात १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात साैरकृषीपंप लावण्यात आले आहे.सिंचन विहीरी, शेततळे, बंधारे यांच्या माध्यमातून शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र पाण्याचा उपसा हाेण्यासाठी साधन असने आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून कृषी पंपासाठी विज जाेडणी दिली जात हाेती. काही शेतकऱ्यांचे शेत मुख्य वीज वाहिनीपासून बऱ्याच दूर अंतरावर राहत असल्याने वीज जाेडणी देणे शक्य हाेत नाही. तसेच बरीचशी वीज कृषी पंपांसाठी वापरली जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध करून दिली जात हाेती. या सर्व अडचणींपासून सुटका करण्यासाठी शासनाने साैरकृषीपंप ही याेजना तीन वर्षांपूर्वी सुरू केली आहे. मागील वर्षीपासून या याेजनेच्या अमंलबजावणीला वेग आला आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात साैरकृषीपंप लावले जात आहेत. गडचिरेाली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाणीपातळी वरच आहे. त्यामुळे साैरकृषीपंप चांगले काम करीत आहे. सुरूवातीला साैरकृषीपंप व्यवस्थित पाण्याचा उपसा करणार नाही. अशी शंका शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात हाेती. मात्र प्रत्यक्ष वापर करताना हा पंप विजेवर चालणाऱ्या पंपाप्रमाणेच काम करीत आहेत.

अर्ज स्वीकारणे सुरूचसाैर कृषी पंपासाठी अर्जस्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागते. शेताजवळ सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. पाच हेक्टरपर्यंत शेत असल्यास तीन एचपीचा पंप दिला जाते. तर पाच हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्यास पाच एचपीचा पंप दिला जाते. एससी व एसटीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के तर इतर लाभार्थ्यांना १० टक्के रक्कम भरावी लागते. महावितरणच्या तालुकास्तरावरील कार्यालये तसेच इतरही कार्यालयांमध्ये याबाबतची माहिती उपलब्ध आहे. 

गडचिराेली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर 

गडचिराेली जिल्हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे नदी, नाल्यांची संख्या अधिक आहे. तसेच जलस्तरही चांगला आहे. मात्र शेतीचे क्षेत्र कमी आहे. तसेच एका शेेतापासून दुसऱ्या शेताचे क्षेत्र बऱ्याच दूर आहे. एका शेतासाठी दाेन ते तीन किमी अंतरावर थ्री-फेज विजेचा पुरवठा करणेही शक्य हाेत नाही. त्यामुळेच बहुतांश शेतकऱ्यांची शेती पडिक असल्याचे दिसून येते. मात्र साैर कृृषीपंप लावल्यास वीजेची गरज पडत नाही. तसेच शेतकऱ्याला विजेचे बीलही येत नाही. पंपाची पाच वर्ष देखभाल ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर साेपविण्यात आली आहे. 

 

टॅग्स :agricultureशेती