शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

शेतकरी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 29, 2014 23:54 IST

जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बियाणांची पेरणी करू की नये या गोंधळात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्याला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाची

गडचिरोली : जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बियाणांची पेरणी करू की नये या गोंधळात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्याला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी नेमक्या याचवेळी गावाकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात जवळपास जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रीय होत असल्याने पेरणीच्या कामांना वेग येत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र यावर्षी जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अजूनपर्यंत जिल्ह्यातील एकाही तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. १७ जूननंतर पावसाने कायमची दडी मारली आहे. जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावा नसल्याने शेतकरी बियाण्यांची पेरणी करण्यास घाबरत आहे. हजारो रूपये किंमतीचे बियाणे पेरल्यानंतर सदर बियाणे पावसाअभावी न उगविल्यास दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी अजुनपर्यंत बियाण्यांची पेरणी केलेली नाही. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात कमालीची घट होत असल्याने काही शेतकऱ्यांनी मात्र बियाण्यांची पेरणी केली आहे. आता मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एकंदरीतच ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे , असे शेतकरी व ज्यांनी पेरणी केली नाही अशाही शेतकऱ्यांवर चिंतेचे मभळ निर्माण झाले आहे. नेमके काय करावे हे सूचत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग कायमचा गोंधळला आहे. पावसाला उशीर झाल्यास कोणत्या बियाण्यांची लागवड करावी, पेरलेले बियाणे वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. कृषी सहाय्यकांचे मात्र गावाकडे फिरणे बंद झाले आहे. घरबसल्या शासनाकडे अहवाल पाठवित आहेत. कृषी सहाय्यकाकडे १० ते १२ गावांचे काम सोपविण्यात आले आहे. एका गावातील शेतकऱ्याने फोन लावल्यानंतर दुसऱ्या गावात असल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याचवेळा तर मिटींगचे कारण देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न कृषी सहाय्यक व कृषी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. आजपर्यंत आधुनिक शेतीची संकल्पना मांडणारे कृषी सहाय्यक ऐन अडचणीच्यावेळी गावाकडे फिरकत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना जवळपास ५० धान रोवणी यंत्र खरेदी करून देण्यात आले आहे. त्याचे प्रशिक्षण, मोठ-मोठे कार्यक्रम घेऊन उन्हाळ्यातच देण्यात आले. त्यामुळे धान लागवडीला उन्हाळ्यातच सुरूवात झाली असावी असे वातावरण निर्माण झाले होते. आता मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पत्ता नाही. (नगर प्रतिनिधी)