शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 29, 2014 23:54 IST

जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बियाणांची पेरणी करू की नये या गोंधळात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्याला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाची

गडचिरोली : जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बियाणांची पेरणी करू की नये या गोंधळात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्याला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी नेमक्या याचवेळी गावाकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात जवळपास जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रीय होत असल्याने पेरणीच्या कामांना वेग येत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र यावर्षी जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अजूनपर्यंत जिल्ह्यातील एकाही तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. १७ जूननंतर पावसाने कायमची दडी मारली आहे. जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावा नसल्याने शेतकरी बियाण्यांची पेरणी करण्यास घाबरत आहे. हजारो रूपये किंमतीचे बियाणे पेरल्यानंतर सदर बियाणे पावसाअभावी न उगविल्यास दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी अजुनपर्यंत बियाण्यांची पेरणी केलेली नाही. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात कमालीची घट होत असल्याने काही शेतकऱ्यांनी मात्र बियाण्यांची पेरणी केली आहे. आता मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एकंदरीतच ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे , असे शेतकरी व ज्यांनी पेरणी केली नाही अशाही शेतकऱ्यांवर चिंतेचे मभळ निर्माण झाले आहे. नेमके काय करावे हे सूचत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग कायमचा गोंधळला आहे. पावसाला उशीर झाल्यास कोणत्या बियाण्यांची लागवड करावी, पेरलेले बियाणे वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. कृषी सहाय्यकांचे मात्र गावाकडे फिरणे बंद झाले आहे. घरबसल्या शासनाकडे अहवाल पाठवित आहेत. कृषी सहाय्यकाकडे १० ते १२ गावांचे काम सोपविण्यात आले आहे. एका गावातील शेतकऱ्याने फोन लावल्यानंतर दुसऱ्या गावात असल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याचवेळा तर मिटींगचे कारण देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न कृषी सहाय्यक व कृषी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. आजपर्यंत आधुनिक शेतीची संकल्पना मांडणारे कृषी सहाय्यक ऐन अडचणीच्यावेळी गावाकडे फिरकत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना जवळपास ५० धान रोवणी यंत्र खरेदी करून देण्यात आले आहे. त्याचे प्रशिक्षण, मोठ-मोठे कार्यक्रम घेऊन उन्हाळ्यातच देण्यात आले. त्यामुळे धान लागवडीला उन्हाळ्यातच सुरूवात झाली असावी असे वातावरण निर्माण झाले होते. आता मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पत्ता नाही. (नगर प्रतिनिधी)