शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

वाघांच्या बंदाेबस्तासाठी गावकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST

भारतीय जनसंसद शाखा गडचिरोलीसह ग्रामपंचायतींच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात वाघाच्या हल्ल्यात ...

भारतीय जनसंसद शाखा गडचिरोलीसह ग्रामपंचायतींच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाखांची एकरकमी मदत द्यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, वाघांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपये देण्यात यावेत. गडचिरोली आणि वडसा वन विभागातील उपवनसंरक्षकांनी नरभक्षी वाघांच्या बंदोबस्ताकरिता कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप ११ लोकांचा बळी गेला, यास जबाबदार दोन्ही वन विभागातील उपवनसंरक्षकांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर यांना देण्यात आले. या आंदाेलनाचे नेतृत्व जनसंसदचे पदाधिकारी नीलकंठ संदोकर, विजय खरवडे, रमेश बांगरे, गडचिरोली पंचायत समितीचे सभापती माराेतराव इचाेडकर, उपसभापती विलास दशमुखे, आंबेशिवणीचे उपसरपंच योगाजी कुडवे आदींनी केले. आंदाेलनात पंचायत समिती सदस्य रामरतन गाेहणे, डाॅ. नीलिमा सिंग आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

(बॉक्स)

सरपंच-उपसरपंचांचा सहभाग

ठिय्या आंदोलनात तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमौशी, खुर्सा, गिलगाव, मुरमाडी, अमिर्झा, मौशिखांब, टेंभा, चांभार्डा, धुंडेशिवणी, राजगाटा चेक, उसेगाव, चेप्रा, दिभना, गोगाव, अडपल्ली, चुरचुरा, नवेगाव, पोर्ला, मेंढा अशा १८ गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक सहभागी झाले आहेत.

(बॉक्स)

- तर शेतकऱ्यांच्या हातात बंदुका द्या

गेल्या तीन-चार महिन्यांपासून गडचिरोली तालुक्यातील १८ गावांच्या परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या १० महिन्यांत ११ शेतकऱ्यांचा बळी गेला असून, अनेक जनावरेही वाघाचे शिकार झाले आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरणाऱ्या या वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हातात बंदुका द्या, वाघाचा आम्ही बंदोबस्त करतो, असा इशारा पं.स.उपसभापती विलास दशमुखे व भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी यावेळी दिला. तीन दिवसांत त्या वाघांना जेरबंद करा, अन्यथा वनसंरक्षक कार्यालयाला कुलूप ठोकू, असेही ते म्हणाले.