शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

दोन महिन्यात ८० वर गार्इंनी सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

पशुसंवर्धन आयुक्तालयाने कोणतीही शहानिशा न करता ज्या पद्धतीने घाईघाईने सदर कंपनीला लाखमोलाच्या ३८३ गाई बहाल केल्या त्यावरून हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. गायींना ठेवण्याची योग्य व्यवस्था, सोयी-सुविधा नसताना त्याबाबत कोणतीही शहानिशा न करता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर कंपनीच्या ताब्यात गाई आणि वासरं मिळून ३८३ जनावरे देण्यात आली.

ठळक मुद्देविमाही काढला नाही : मौल्यवान गार्इंच्या मालकी हक्कापासून शेतकरी वंचित

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांची कंपनी म्हणून गोंडवाना स्मॉल फार्मर प्रोड्युसर कंपनीला पशुसंवर्धन विभागामार्फत दोन महिन्यांपूर्वी देण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या महागड्या फ्रिजवाल गाई प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेल्याच नाहीत. शेतकºयांच्या नावाने लाटलेल्या या गाई दोन महिन्यांपासून सदर कंपनीने आपल्याच ताब्यात ठेवल्या आहे. विशेष म्हणजे त्यांची योग्य देखभाल होत नसल्यामुळे दोन महिन्यात ३८३ पैकी ८० पेक्षा जास्त गार्इंनी प्राण सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पशुसंवर्धन आयुक्तालयाने कोणतीही शहानिशा न करता ज्या पद्धतीने घाईघाईने सदर कंपनीला लाखमोलाच्या ३८३ गाई बहाल केल्या त्यावरून हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. गायींना ठेवण्याची योग्य व्यवस्था, सोयी-सुविधा नसताना त्याबाबत कोणतीही शहानिशा न करता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर कंपनीच्या ताब्यात गाई आणि वासरं मिळून ३८३ जनावरे देण्यात आली. पण पुणे ते गडचिरोली या प्रवासातच त्यातील ३३ जनावरांचा मृत्यू झाला. उर्वरित ३५० पैकी दोन महिन्यात पुन्हा ५० वर गाई दगावल्या आहेत. त्यामुळे आता ३८३ पैकी जेमतेम ३०० च्या घरात गाई शिल्लक आहेत. योग्य दखल न घेतल्यास गायी दगावण्याचा हा क्रम असाच सुरू राहून वर्षभरात सर्वच गाई दगावतात की काय? अशी भीती खुद्द पशुसंवर्धन विभागाचे अधिकारीच आता व्यक्त करत आहेत.भारतीय लष्कराच्या या दुधाळू गायींची किंमत प्रत्येकी लाखाच्या घरात आहे. पण गरजवंत शेतकऱ्यांना गायी मिळतील आणि त्यांच्या उत्पान्नात भर पडेल म्हणून नाममात्र १२०० रुपये प्रतिगाय मोबदला आकारून या गायी देण्यात आल्या. मात्र अद्याप एकाही शेतकºयाच्या ताब्यात गाय देण्यात आलेली नाही. गायींना ओळखता यावे म्हणून त्यांना पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने टॅग लावले. पण पशुसंवर्धन विभागाकडून गायी सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र घेऊन विमा काढण्यात आलेला नाही. कारण विमा काढण्यासाठी संबंधित पशुपालक शेतकºयाचे गाईसोबतचे छायाचित्र आणि इतर कागदपत्रांची गरज असते. इथे मात्र लाभार्थी पशुपालक कोण हेच ठरलेले नसल्यामुळे कोणत्याही गायीचा विमा उतरविणे कंपनीला शक्य झालेले नाही. परिणामी एकामागून एक गायीमरण पावत असतानाही त्या लाखमोलाच्या गायींचा कोणताही मोबदला विमा कंपनीकडून मिळवता आलेला नाही.शेतकºयांना गायींचे वाटप झाले नाही. गोंडवाना बँडही अस्तित्वात आला नाही. मग या गार्इंचे दूध नेमके कुठे जात आहे आणि त्याचा मोबदला कोण लाटत आहे, हाच खरा संशोधनाचा विषय झाला आहे.गोंडवाना ब्रँडबाबत अधिकारीच अनभिज्ञशेतकºयांना (पशुपालक) फ्रिजवल गायी देऊन त्यांच्या भागीदारीतून गोंडवाना स्मॉल फार्मर प्रोड्युसर कंपनीने गोंडवाना दूध ब्रँड अस्तित्वात आणायचा होता. याबाबत जिल्हा दूग्धविकास अधिकारी सचिन यादव यांना विचारले असता, फ्रिजवाल गाई घेतलेल्या सदर कंपनीला दुधाच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपल्यावर असली तरी अद्याप या कंपनीने कोणतेही मार्गदर्शन घेतले नसल्याचे सांगितले. दुधाचा गोंडवाना ब्रँडही अद्याप अस्तित्वात आला नसल्याची माहिती त्यांनी दिली.- तर त्या कंपनीकडून गाई परत घेणारगाई वाटप केल्यानंतर मी गेल्या महिन्यात आरमोरी येथील या प्रकल्पाच्या साईटला भेट दिली होती. त्यावेळी तिथे बºयापैकी व्यवस्था होती. मात्र कंपनीचे भागधारक म्हणून दाखविलेले कोणतेही शेतकरी मला भेटले नाही. शेतकरी कुठे आहेत असा प्रश्नही मी केला होता. वास्तविक या दूध उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांनाच मिळायला हवा. ही योजना शेतकºयांसाठीच आहे. पण तसे होताना दिसत नसेल तर सदर कंपनीला वाटलेल्या गाई परत घेऊन त्या शेतकºयांना वाटप केल्या जाईल.- डॉ.डी.डी. परकाळे, अतिरिक्त आयुक्त,पशुसंवधन विभाग, पुणे

टॅग्स :cowगाय