शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

२० लाख भाविक पोहोचले

By admin | Updated: July 21, 2015 02:29 IST

गोदावरी नदीचा राज्यातील शेवटचा प्रवास सिरोंचा तालुक्यातून होतो. नाशिक येथे कुंभमेळा सुरू झाल्यापासून गोदावरी

पुष्कर मेळावा : सिरोंचा तालुक्यातून तेलंगणात गर्दी वाढलीसिरोंचा : गोदावरी नदीचा राज्यातील शेवटचा प्रवास सिरोंचा तालुक्यातून होतो. नाशिक येथे कुंभमेळा सुरू झाल्यापासून गोदावरी नदीच्या काठावर तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात पुष्कर महोत्सव साजरा केला जात आहे. आतापर्यंत या पुष्कर मेळाव्यात मागील पाच दिवसांत २० लाख भाविकांनी पवित्र स्नान केले आहे.यात महाराष्ट्रातील हजारो भाविकांचा समावेश आहे. शनिवार, रविवारी सुटी आल्यामुळे तब्बल १० लाख भाविकांनी पुष्कर मेळाव्याला भेट देऊन गोदावरीत नदीत स्रान केले. हैद्राबाद शहरापासून ते संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र तसेच छत्तीसगडमधून मोठ्या संख्येने भाविक पुष्कर मेळाव्यात दाखल होत आहेत. तेलंगणा सरकारने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पोलीस सुरक्षा बंदोबस्तासह संपूर्ण व्यवस्था केली. विशेष म्हणजे या पुष्कर मेळाव्यात भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय तेलंगणा सरकारने होऊ दिली नाही. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातूनही हजारो भाविक सिरोंचा येथे येऊन तेथून नावेतून गोदावरी नदीत स्नान करीत आहेत. गेल्या पाच दिवसात २० लाखांवर भाविकांनी कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या हद्दीतील या गोदावरी नदीच्या घाटावर पुष्कर मेळाव्यात कुठलीही व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. गडचिरोली पोलिसांचा बंदोबस्त वगळता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारची उदासीनता दिसून येत असल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी तेलंगणा सरकारचे कौतुक करून महाराष्ट्र राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या पुष्कर मेळाव्याला तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष मधुसुदन चारी, तेलंगणाचे महसूल मंत्री इटला राजेंदर, आरोग्यमंत्री व काँग्रेसचे माजी खा. लगड पाटी राजगोपाल यांच्यासह रोज दोन ते तीन मंत्री भेट देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)हंसराज अहीर यांनीही केली बासर येथे पूजा४केंद्रीय रसायन व खत मंत्री हंसराज अहीर यांनी तेलंगणा राज्याच्या बासर येथे जाऊन पुष्कर मेळाव्यात महापूजा केली. अहीर यांनी सिरोंचाच्या गोदावरी घाटांकडे पूजेसाठी पाठ फिरवत तेलंगणा राज्याच्या बासर येथे जाऊन महापूजा केल्यामुळे या भागातील नागरिकांनी केंद्रीय मंत्र्यांना आपल्या जुन्या मतदार संघाचा आता विसर पडला आहे, अशी भावना बोलून दाखविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्रामही पुष्कर मेळाव्याकडे फिरकले नाही.