शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

धान खरेदी केंद्रांअभावी शेतकरी अडचणीत

By admin | Updated: January 10, 2016 01:46 IST

एटापल्ली : धान साठवणुकीसाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत तालुक्यातील हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : खासगी व्यापाऱ्यांकडून लूटएटापल्ली : धान साठवणुकीसाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत तालुक्यातील हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे धान कुठे विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम व आदिवासीबहुल आहेत. या गावातील नागरिकांना शासनाचा हमीभाव मिळावा व खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची होणारी लूट थांबावी यासाठी दरवर्षीच हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू केले जात होते. परिसरातील बहुतांश शेतकरी याच धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नेत होते. मात्र मागील दोन वर्षांच्या कालावधीत धानाची उचल न झाल्याने शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी ज्या धान खरेदी केंद्राकडे धान्य साठवणुकीची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी नाकारली. या नियमाचा फटका हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणच्या खरेदी केंद्रांना बसला. सदर केंद्र सुरूच झाले नाही. धान खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल १ हजार ४१० रूपये दराने धानाची खरेदी केली जाते. मात्र या परिसरात धान खरेदी केंद्रच नसल्याने धान कुठे विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेण्यास सुरू केली आहे. केवळ ८०० ते १००० रूपये प्रती क्विंटल दराने धान खरेदी केली जात आहे. एटापल्ली, गट्टा, कसनसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर धान खरेदी केंद्रांचे अंतर ४० ते ५० किमी पडत असल्याने शेतकरी वर्ग या ठिकाणी धान नेऊ शकत नाही. एटापल्ली तालुक्यात अडीचशे ते तीनशे गावे आहेत. ९५ टक्के नागरिक शेतीचा व्यवसाय करतात. धानाचे उत्पादनही प्रचंड प्रमाणात होते. धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. खरेदी केंद्राऐवजी पर्यायी उपाययोजना करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)