शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

धान खरेदी केंद्रांअभावी शेतकरी अडचणीत

By admin | Updated: January 10, 2016 01:46 IST

एटापल्ली : धान साठवणुकीसाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत तालुक्यातील हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : खासगी व्यापाऱ्यांकडून लूटएटापल्ली : धान साठवणुकीसाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत तालुक्यातील हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे धान कुठे विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम व आदिवासीबहुल आहेत. या गावातील नागरिकांना शासनाचा हमीभाव मिळावा व खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची होणारी लूट थांबावी यासाठी दरवर्षीच हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू केले जात होते. परिसरातील बहुतांश शेतकरी याच धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नेत होते. मात्र मागील दोन वर्षांच्या कालावधीत धानाची उचल न झाल्याने शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी ज्या धान खरेदी केंद्राकडे धान्य साठवणुकीची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी नाकारली. या नियमाचा फटका हालेवारा, तोडसा, जारावंडी, कोटमी, घोटसूर या ठिकाणच्या खरेदी केंद्रांना बसला. सदर केंद्र सुरूच झाले नाही. धान खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल १ हजार ४१० रूपये दराने धानाची खरेदी केली जाते. मात्र या परिसरात धान खरेदी केंद्रच नसल्याने धान कुठे विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेण्यास सुरू केली आहे. केवळ ८०० ते १००० रूपये प्रती क्विंटल दराने धान खरेदी केली जात आहे. एटापल्ली, गट्टा, कसनसूर या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर धान खरेदी केंद्रांचे अंतर ४० ते ५० किमी पडत असल्याने शेतकरी वर्ग या ठिकाणी धान नेऊ शकत नाही. एटापल्ली तालुक्यात अडीचशे ते तीनशे गावे आहेत. ९५ टक्के नागरिक शेतीचा व्यवसाय करतात. धानाचे उत्पादनही प्रचंड प्रमाणात होते. धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. खरेदी केंद्राऐवजी पर्यायी उपाययोजना करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)