शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम पामाजीगुडा शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 00:25 IST

शहरी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला असल्याचे नेहमीच प्रत्ययास येते. दुर्गम भागात शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली असल्याची समज

शिक्षकांचा पुढाकार : स्वच्छतेची कास, धुम्रपानास बंदी, गुणवत्तावाढीवर भररवी रामगुंडेवार  एटापल्लीशहरी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला असल्याचे नेहमीच प्रत्ययास येते. दुर्गम भागात शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली असल्याची समज बहुतेकजण करतात. मात्र याला एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत सूरजागड केंद्रातील पामाजीगुडा शाळा अपवाद ठरली आहे. येथील या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या पुढाकाराने दुर्गम भागातील ही शाळा आता शैक्षणिक गुणवत्तेत पुढे आहे. शिक्षक व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून सदर शाळेचा कायापालट झाला आहे.२८ पासून २५ किमी अंतरावर असलेल्या पामाजीगुडा गावाला जाण्यासाठी ३ किमीची पायपीट करावी लागते. पामाजीगुडा गावाची लोकसंख्या २३८ आहे. येथे १९९२ मध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. २८ जून २०१६ रोजी या शाळेत अयाज खलील शेख हे शिक्षक रूजू झाले. त्यावेळी १ ते ४ वर्गात १३ विद्यार्थी पटसंख्या होती. त्यावेळी शाळेची अवस्थाही भकास होती. दरम्यान शेख यांनी या शाळेचा कायापालट करण्याचा निश्चय केला. आता या शाळेत टाईल्स दुरूस्ती करण्यात आली असून वऱ्हांड्याचा वापर अध्यापनासाठी व कार्यालय म्हणून करण्यात येत आहे. ध्वजासाठी खांब लावण्यात आला असून ग्रामस्थांनी बांबूचा वापर करून शाळेच्या संरक्षणार्थ कुंपन केले आहे. शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली असून परिसर स्वच्छता निटनेटकी आहे. येथे ज्ञानरचनावादी पद्धतीतून शिक्षणाचे धडे दिले जात आहे. सन २०१४ मध्ये या शाळेत विद्यार्थी पटसंख्या २६, २०१५ मध्ये २० व २०१६ मध्ये २७ विद्यार्थी पटसंख्या आहे. शालेय परिसरात गुलमोहर, करंजी, कडूलिंब, कॅशिया, सुबाबुळ आदी रोपांचे वृक्षारोपण ग्रामस्थ व शिक्षकांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. शाळेची शैक्षणिक प्रगती पाहून येथील ग्रामसभेने पेसा कायद्याअंतर्गत शाळेला ४० हजार रूपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.