शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:13 IST

गौण खनिज खननावर शासनाने लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्या या मुख्य मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्दे३०० ट्रॅक्टर सहभागी : गौण खनिज खननावरील जाचक अटी रद्द करा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गौण खनिज खननावर शासनाने लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्या या मुख्य मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्हाभरात जवळपास ३०० ट्रॅक्टर सहभागी होते.महाराष्ट्र शासनाने १२ जानेवारी २०१८ रोजी गौण खनिज वाहतुकीसंदर्भात कायदा केला आहे. यामध्ये रेती किंवा इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित ट्रॅक्टवर सुमारे एक लाख रूपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. या अधिनियमानुसार गडचिरोली शहरात कारवाई सुद्धा करण्यात आली. सदर कायदा रद्द करावा, रेती घाट घेण्यापूर्वी ज्या शर्ती व अटी होत्या, त्याच लागू कराव्या, नक्षलग्रस्त भागातील व जंगलातील रेती घाटांवर नेटवर्क राहत नाही. त्यामुळे इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण होते. रेतीघाटावर जीपीएस व सीसीटीव्ही शासनाने स्व:खर्चाने लावावी, टीपीचा कालावधी एक तासाने वाढवावा, मुरूमाची परवानगी घेताना वाहनाच्या क्रमांकाची अट नसावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष देवतळे, नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्राध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. यावेळी ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एजाज शेख, उपाध्यक्ष संतोष लांजेवार, सचिव दिनेश आकरे, कोषाध्यक्ष प्रफुल चापले, संजय वडेट्टीवार, रणजीत ओल्लालवार, रोशन भांडेकर, दिवाकर चापले, जितू भांडेकर आदी उपस्थित होते.