शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

३६४ शाळांचे विद्युतीकरण नाही

By admin | Updated: February 28, 2017 00:44 IST

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : दुर्गम भागातील शेकडो शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधांचा अभावगडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत. यापैकी ग्रामीण व दुर्गम भागातील ३६४ शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी अडचण जाणवत आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५० प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये चार हजारवर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शाळांमध्ये शौचालय, प्रसाधनगृह, संरक्षण भिंत तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानाची सुविधा नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अद्यापही विद्युतीकरणाची सोय न झालेल्या ३६४ शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील आठ, आरमोरी तालुक्यातील आठ, कुरखेडा सात, धानोरा ३१, चामोर्शी १२, अहेरी ७८, एटापल्ली ७६, सिरोंचा ५३, मुलचेरा ९, कोरची २७ व भामरागड ५५ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचा सराव करण्यासाठी शाळेमध्ये विद्युतीकरण असणे आवश्यक आहे. मात्र ३६४ शाळांमध्ये विद्युतीकरण नसल्याने लाऊडस्पीकर लावता येत नाही. परिणामी दिवसाच सांस्कृतिक कार्यक्रम उरकून घ्यावे लागतात. विद्यमान राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेमधील परिपाठ हा लाऊडस्पीकरच्या सहाय्याने घ्यावयाचा आहे. मात्र विद्युतीकरण न झालेल्या शाळांमध्ये परिपाठ पूर्वीसारखाच लाऊडस्पीकरशिवाय घेतला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)२७० शाळांना संरक्षण भिंत नाहीगडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील एकूण २७० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही संरक्षण भिंती उभारण्यात आल्या नाही. त्यामुळे या शाळांच्या परिसरात दिवसा व रात्री मोकाट जनावरे प्रवेश करतात. विद्यार्थीही असुरक्षित राहतात. संरक्षण भिंत नसलेल्या शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९, आरमोरी ९, कुरखेडा १७, धानोरा ३६, चामोर्शी ३६, अहेरी ५१, एटापल्ली २८, सिरोंचा २०, मुलचेरा ७, कोरची २२ व भामरागड तालुक्यातील ३५ शाळांचा समावेश आहे.वर्गखोलीतच बसतात अनेक मुख्याध्यापकएकूण १ हजार ५५० जि.प. शाळांपैकी ९७२ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तब्बल ५७८ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे या शाळांमधील मुख्याध्यापक वर्गखोलीतच बसून शाळेतील प्रशासकीय कामकाज सांभाळतात.६९२ शाळांमध्ये क्रीडांगणाची व्यवस्था नाहीजि.प.च्या एकूण ६९२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचा सराव करण्यासाठी क्रीडांगणाची (मैदान) व्यवस्था नाही. त्यामुळे क्रीडा विकासावर परिणाम होत आहे.