शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

३६४ शाळांचे विद्युतीकरण नाही

By admin | Updated: February 28, 2017 00:44 IST

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : दुर्गम भागातील शेकडो शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधांचा अभावगडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत. यापैकी ग्रामीण व दुर्गम भागातील ३६४ शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी अडचण जाणवत आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५० प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये चार हजारवर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शाळांमध्ये शौचालय, प्रसाधनगृह, संरक्षण भिंत तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानाची सुविधा नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अद्यापही विद्युतीकरणाची सोय न झालेल्या ३६४ शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील आठ, आरमोरी तालुक्यातील आठ, कुरखेडा सात, धानोरा ३१, चामोर्शी १२, अहेरी ७८, एटापल्ली ७६, सिरोंचा ५३, मुलचेरा ९, कोरची २७ व भामरागड ५५ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचा सराव करण्यासाठी शाळेमध्ये विद्युतीकरण असणे आवश्यक आहे. मात्र ३६४ शाळांमध्ये विद्युतीकरण नसल्याने लाऊडस्पीकर लावता येत नाही. परिणामी दिवसाच सांस्कृतिक कार्यक्रम उरकून घ्यावे लागतात. विद्यमान राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेमधील परिपाठ हा लाऊडस्पीकरच्या सहाय्याने घ्यावयाचा आहे. मात्र विद्युतीकरण न झालेल्या शाळांमध्ये परिपाठ पूर्वीसारखाच लाऊडस्पीकरशिवाय घेतला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)२७० शाळांना संरक्षण भिंत नाहीगडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील एकूण २७० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही संरक्षण भिंती उभारण्यात आल्या नाही. त्यामुळे या शाळांच्या परिसरात दिवसा व रात्री मोकाट जनावरे प्रवेश करतात. विद्यार्थीही असुरक्षित राहतात. संरक्षण भिंत नसलेल्या शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९, आरमोरी ९, कुरखेडा १७, धानोरा ३६, चामोर्शी ३६, अहेरी ५१, एटापल्ली २८, सिरोंचा २०, मुलचेरा ७, कोरची २२ व भामरागड तालुक्यातील ३५ शाळांचा समावेश आहे.वर्गखोलीतच बसतात अनेक मुख्याध्यापकएकूण १ हजार ५५० जि.प. शाळांपैकी ९७२ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तब्बल ५७८ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे या शाळांमधील मुख्याध्यापक वर्गखोलीतच बसून शाळेतील प्रशासकीय कामकाज सांभाळतात.६९२ शाळांमध्ये क्रीडांगणाची व्यवस्था नाहीजि.प.च्या एकूण ६९२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचा सराव करण्यासाठी क्रीडांगणाची (मैदान) व्यवस्था नाही. त्यामुळे क्रीडा विकासावर परिणाम होत आहे.