शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

माडिया भाषेत शिकवले की मुलांचे चेहरे लगेच खुलतात... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 12:07 IST

Gadchiroli news ज्या दुर्गम भागात पायही ठेवण्यासाठी शिक्षक सहजासहजी धजावत नाहीत, त्या भागात केवळ वर्ग घेण्याची औपचारिकता न करता विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत शिकवून शिक्षणाची गोडी लावणाऱ्या या शिक्षकाने तमाम शिक्षकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकाचे प्रेरणादायी कार्य

 

मनोज ताजने

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून तब्बल २४३ किलोमीटर अंतरावर, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या आसरअल्ली या सिरोंचा तालुक्यातील दुर्गम गावात जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिकविणारे शिक्षक खुर्शीद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. ज्या दुर्गम भागात पायही ठेवण्यासाठी शिक्षक सहजासहजी धजावत नाहीत, त्या भागात केवळ वर्ग घेण्याची औपचारिकता न करता विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत शिकवून शिक्षणाची गोडी लावणाऱ्या या शिक्षकाने तमाम शिक्षकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. (Education in Madia language in Gadchiroli district )

भौतिक सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या आसरअल्ली या गावात आदिवासींमधील अतिमागास माडिया जमातीचे प्राबल्य आहे. त्यामुळे मुलांना माडिया आणि थोडीफार तेलगू यापलिकडची भाषा माहीत नव्हती. अशा स्थितीत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गातून शिकवल्या जाणारे मराठीतील शिक्षण सर्वांच्या डोक्यावरून जात होते. ८ वर्षांपूर्वी खुर्शिद शेख यांची तिथे बदली झाली आणि या शाळेत शिक्षणाचा नवीन अध्याय सुरू झाला. आसरअल्लीला येण्यापूर्वी सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर या अतिदुर्गम भागात सहा वर्ष शिकवल्यामुळे शेख यांना माडिया भाषा चांगली अवगत झाली होती. त्याचा फायदा आसरअल्लीच्या शाळेत शिकवण्यासाठी झाला. आज त्या शाळेतील मुले केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर मराठी, हिंदी या भाषाही चांगल्या प्रकारे बोलू लागले आहेत. त्यांच्यातील न्यूनगंड दूर होऊन त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलण्याची ही किमयाच खुर्शीद शेख यांना राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन गेली.

अन् ४७ चे झाले २०० विद्यार्थी

मुलांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगितले तर त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, हे लक्षात घेऊन शेख सरांनी मुलांशी संवाद वाढविला. पालकांची भेट घेऊन त्यांनाही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी प्रवृत्त केले. हळूहळू मुलांना शिक्षणाची गोडी लागली आणि आठ वर्षांपूर्वी असलेली ४७ विद्यार्थ्यांची संख्या आज २०० वर पोहोचली. यासाठी ग्रामपंचायतनेही शाळेत संगणकासारख्या सुविधा पुरवत सर्व सहकार्य केल्याचे खुर्शिद शेख आवर्जुन सांगतात.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र