शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

शेतकरी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

By admin | Updated: February 27, 2017 01:16 IST

तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरी सांस्कृतिक सभागृहात शनिवारपासून आयोजित करण्यात आले होते.

साहित्यिकांची मांदियाळी : शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचारमंथन गडचिरोली : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरी सांस्कृतिक सभागृहात शनिवारपासून आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्या, त्याला कारणीभूत सरकारचे धोरण, कृषी नितीच्या अंमलबजावणीचा अभाव यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर व विषयांवर विचारमंथन करण्यात आले. या संमेलनाचा समारोप रविवारी साहित्यिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते वामनराव चटप होते. मंचावर ज्येष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. शेषराव मोहिते, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, अनिल घनवट, शैलजा देशपांडे, राजेंद्रसिंह ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर साहित्य संमेलनात ‘भारतीय शेतीची पराधिनता’, स्वामीनाथन आयोग आणि मुक्त अर्थव्यवस्था, शेतकरी विरोधी कायद्याचा परिचय, शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेतकरी यशोगाथांचे गौडबंगाल आदी विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. याशिवाय शेतकरी कवी संमेलन, प्रकट मुलाखत, मुलाखतीचा कार्यक्रमही घेण्यात आला. याप्रसंगी आता पेटवू सारे रान या समारोपीय सत्रात अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सद्य स्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कशी दयनिय अवस्था झाली आहे, त्याची कारणे कोणती, शेतकरी आत्महत्या वाढीस शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कसे जबाबदार आहे, विदर्भातील शेतकऱ्यांवर सरकारकडून अन्याय होत आहे. या साऱ्या बाबी अत्यंत पोटतिडकीने मांडल्या. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी नव्या मार्गाने मोठे आंदोलन करण्याची गरज आहे, असे चटप यांनी सांगितले. समारोपीय कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील नवोदित कवी, साहित्यीक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) लोकगीत समाजाचा आरसा आहे - सुमिता कोेंडबत्तुनवार लोक परंपरा, लोक संस्कृती, कादंबरी तसेच लोकगीतात शेतकऱ्यांचे दु:ख लपले आहे. शेतकऱ्यांचे जीवन पूर्वीप्रमाणे आजही अतिशय दु:खमय आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाला सीमा नाही. लोकगीत खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा आहे. पारंपरिक कथा व लोकगीतातून ग्रामीण भागातील स्त्रित्वाचे वास्तव दर्शन होते, असे प्रतिपादन नागपूर येथील साहित्यीक तथा शिक्षिका डॉ. सुमिता कोंडबत्तुनवार यांनी केले. पारंपरिक कथा-लोकगीते : ग्रामीण स्त्रित्वाचे वास्तव दर्शन या विषयावर आयोजित परिसंवादात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रज्ञा बापट, वसुंधरा काशीकर (भागवत), गीता खांडेभराड, अनिल घनवट आदी मान्यवर उपस्थित होते. या परिसंवाद सत्राचे प्रास्ताविक व संचालन सीमा नरोडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. कोंडबत्तुनवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लोककला व लोकगीतांचे सविस्तरपणे विवेचन केले. याप्रसंगी त्यांनी अनेक प्रकारची लोकगीते सादर करून ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीवन कसे आहे, हे उलगडून दिले. शेतीचे काम येणारी मुलगी जीवनात कधीही सरस ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींनी स्वत:ला कमी समजू नये. त्यांच्यात गुणवत्ता आहे, असे त्यांनी सांगितले.