शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीतून रेतीची तेलंगणात तस्करी

By admin | Updated: August 19, 2016 00:54 IST

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील मद्दीकुंठा रेतीघाटावरून हजारो ब्रॉस रेतीची तेलंगणा राज्यातील वरंगल, करीमनगर, हैद्राबाद

विजय वडेट्टीवार यांचा आरोप : दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील मद्दीकुंठा रेतीघाटावरून हजारो ब्रॉस रेतीची तेलंगणा राज्यातील वरंगल, करीमनगर, हैद्राबाद या शहरांमध्ये अवैध रेती तस्करी केली जात आहे. आतापर्यंत ६ हजार ब्रॉसपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करून तेलंगणा राज्यात विक्री करण्यात आली आहे. महसूल विभाग व खनिकर्म विभागाच्या आशीर्वादाने सदर तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यासंपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर मोफाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून गोदावरी नदी आहे. तेलंगणा सीमेकडे असलेल्या नदीपात्रात पाणी असल्याने त्यातून रेतीचे उत्खनन करता येत नाही. त्यामुळे तेलंगणा राज्यातील रेती तस्करांनी गडचिरोली जिल्ह्यातील महसूल आणि खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून मद्दीकुंठा रेती घाटातून राजरोसपणे रेतीचे उत्खनन सुरू केले आहे. रेती घाटातून उत्खनन केलेली जवळपास ६ हजार ब्रॉस रेती नदी घाटापासून जवळच असलेल्या एका शेतामध्ये ठेवण्यात आली आहे. महसूल विभागाने सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गोदावरी नदीपात्रातील नगरम १ व २, मद्दीकुंठा, तेकराटाला, जाफ्राबाद, रेगुंठा माल, मुकड्डीकुठा, मुत्ताराममाल, तरडा, कोठामाल, अंकिता माल यासह १४ रेतीघाटांची ४१ कोटी ८५ लाख ९७ हजार ५०० रूपये किंमत ठेवून लिलाव करण्याचा प्रस्ताव सिरोंचाचे तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव तयार करण्यात सिरोंचा येथील एका नायब तहसीलदाराने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. हा नायब तहसीलदार तलाठीपासून नायब तहसीलदार पदापर्यंत पदोन्नती घेत फक्त सिरोंचा परिसरातच नोकरी केली आहे. रेतीच तस्करी करणाऱ्या कंत्राटदारासोबत साठगाठ असल्याने त्याची बदली होऊनसुद्धा त्याला पुन्हा सिरोंचा येथेच ठेवण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने महसूल आयुक्ताकडे पाठविला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महसूल, खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या संगणमताने रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जवळच्या शेतात रेतीचा साठा मद्दीकुंठा रेती घाटातून रेतीचा उपसा केल्यानंतर सदर रेती पुलापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका शेतात साठवून ठेवली जाते. सध्या या शेतात जवळपास ६ हजार ब्रॉस रेतीचा साठा करण्यात आला आहे. त्यानंतर या रेतीची पुलावरून वरंगल, करिमनगर, हैद्राबाद या शहरांमध्ये तस्करी केली जाते. यातून कंत्राटदार कोट्यवधी रूपये कमवित आहे. मात्र महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. फिटनेस सर्टिफिकेट नसतानाही पुलावरून अवजड वाहतूक गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. तसेच या पुलाचे फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा अद्याप प्राप्त झाले नाही. अशाही परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने रेती तस्करीची अवजड वाहने या पुलावरून नेली जात आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. पूल कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शासनाचेही कोट्यवधींचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे रेती तस्करी करणाऱ्या जड वाहनांना या पुलावरून वाहतूकीस प्रतिबंध घालावा, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.