शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रेगुलवाहीतील बंधाऱ्याने शेतकऱ्यांना दिला आधार

By admin | Updated: January 13, 2016 01:54 IST

जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या रेगुलवाही गावात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

जिमलगट्टा : जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या रेगुलवाही गावात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. १९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प उभे राहू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावरच शेती करावी लागते. ही परिस्थिती जिमलगट्टा व परिसरातील अनेक गावांची आहे. या परिसराला जंगलाने वेढलेले असून बाराही महिने नाल्यांना पाणी असते. गावात एकही तलाव नाही, अशी परिस्थिती रेगुलवाहीची होती. गेल्यावर्षी येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे गावाजवळ पाणी जमा झाले. आता या परिसरातील शेतकरी धानाचे दुबार पीक बंधाऱ्याच्या पाण्यामुळे घेऊ लागले आहे. यावर्षीसुध्दा हे पीक घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. (वार्ताहर)रेगुलवाहीला रस्त्याची प्रतीक्षाजिमलगट्टापासून रेगुलवाहीला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावरून चारचाकी वाहने जात नाही. दुचाकी वाहने किंवा पायदळ अथवा बैलबंडीने जावे लागते. या भागात विजेचा पुरवठा असला तरी वीज कधी येते व कधी जाते याचा नेम नाही. कधी कधी आठवडाभर विद्युत पुरवठा खंडीत राहतो, अशी परिस्थिती आहे. मात्र याकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष झाले आहे.