शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पॉलिबंधाऱ्याने शेकडो हेक्टर शेतीला मिळाले पाणी

By admin | Updated: November 7, 2015 01:26 IST

कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथील शेतकऱ्यांनी प्रा. नीलकंठ लोनबले यांच्या मार्गदर्शनात पॉलिबांधची निर्मिती केली.

दुष्काळातही पीक जगले : पलसगड येथील शेतकऱ्यांचा नावीन्यपूर्ण उपक्रमकुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथील शेतकऱ्यांनी प्रा. नीलकंठ लोनबले यांच्या मार्गदर्शनात पॉलिबांधची निर्मिती केली. या बंधाऱ्यामुळे शेकडो हेक्टर शेती दुष्काळाच्या परिस्थितीतही हिरवीगार राहिली आहे. त्याचबरोबर या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे. पलसगड गावाजवळून सती नदी वाहते. सती नदीच्या काठाला शेकडो हेक्टर शेती आहे. पावसाळ्यानंतर या नदीचे पाणी कमी होत असून एका बाजुला धार पडते. मात्र सदर पाणी सुद्धा अडविण्यासाठी कोणतीच उपाययोजना नसल्याने हे पाणी पुढे वाहून जात होते. त्यामुळे नदी काठाजवळची शेकडो हेक्टर जमिनीतील पिके पाण्याअभावी करपत होती. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती झाली होती. दरवर्षीच पीक करपत असल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला होता. कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. नीलकंठ लोनबले यांनी सती नदीच्या पात्राची पाहणी केली. या नदीवर पॉलिबांधाची निर्मिती अत्यंत कमी खर्चात करणे शक्य असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही बाब पलसगड येथील शेतकरी डाकराम कसारे, वासुदेव तुलावी, काशिना नैताम, मसरू नैताम, कैलास नैताम यांच्या लक्षात आणून दिली. प्रा. लोनबले यांची संकल्पना शेतकऱ्यांना रूचल्याने बैलबंडीने रेती आणून सती नदीच्या पात्रात पॉलिबांधाची निर्मिती केली. अवघ्या चार दिवसांत सदर बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले. बंधाऱ्यासाठी नदीपात्रातीलच रेतीचा वापर करण्यात आला. मात्र रेती सछिद्र राहत असल्याने त्यातून पाणी झिरपते. रेतीच्या आतमध्ये पॉलिथीनचा वापर केल्यास सदर पाणी झिरपत नाही. त्याचबरोबर ओलावा राहत असल्याने पॉलिथीनही खराब होत नाही. या पद्धतीने बंधाऱ्याची निर्मिती केल्यानंतर पाणी साचले आहे. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असतानाही या परिसरातील धानाचे पीक वाचले आहे. त्याचबरोबर हे पाणी पुढे मार्च महिन्यापर्यंत टिकणार असल्याने दुबारपिकही घेणे शक्य होणार आहे. (तालुका प्रतिनिधी) एक किमीवर पसरले पाणीपॉलिबंधाऱ्यामुळे सती नदीच्या पात्रात सुमारे एक किमीवर पाणी पसरले आहे. एक किमीच्या परिसरात हजारो हेक्टर शेती आहे. या शेतीला आता पाणी देणे शक्य होणार आहे. बंधाऱ्याजवळ चार ते पाच फूट पाणी साचले आहे. आजपर्यंत या भागातील फार कमी शेतकरी भाजीपाला किंवा इतर पिकांचे उत्पादन घेत होते. पाणी नसल्याने पीक कसे घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत होता. मात्र बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड करण्याचे नियोजन केले आहे.प्रेरणादायी उपक्रमगडचिरोली जिल्ह्यात शेकडो नदी, नाले आहेत. या नाल्यांवर अशा प्रकारच्या छोटेखानी बंधाऱ्याची निर्मिती झाल्यास सिंचनाचा प्रश्न आपोआप मिटेल. यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी व फायद्याचा आहे, अशी प्रतिक्रिया प्रा. लोनबले यांनी व्यक्त केली.