शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

४९ लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: January 22, 2015 01:12 IST

जिल्ह्यात वन विभागाने विविध योजनांतर्गत सुमारे ४९ लाख वृक्षांची लागवड केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण भूभागाच्या ७८ टक्के भूभागावर जंगल आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात वन विभागाने विविध योजनांतर्गत सुमारे ४९ लाख वृक्षांची लागवड केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण भूभागाच्या ७८ टक्के भूभागावर जंगल आहे. भामरागड, धानोरा, एटापल्ली, सिरोंचा ही तालुके जवळपास ९० टक्के जंगलांनी व्यापली आहेत. यातील काही वृक्षांची अवैध तोड होते. तर काही वृक्ष वयोवृद्ध झाल्याने मरण पावतात. या जागेवर नवीन वृक्षांची लावगड न झाल्यास जंगलाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता राहते. त्यामुळे वन विभागाकडून दरवर्षीच वृक्ष लागवड करण्यात येते. २०१४-१५ या वर्षात गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या पाचही वन विभागांनी ४९ लाख एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये आलापल्ली वन विभागाने १४.४८५ लाख, भामरागड वन विभागाने ४.२६ लाख, सिरोंचा वन विभागाने २.८८ लाख, गडचिरोली वन विभागाने १७.०९ लाख, देसाईगंज वन विभागाने १०.३९ लाख वृक्षांची लागवड केली आहे. वृक्ष लागवडीबरोबरच वन विभागाकडून वृक्ष जगविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यासाठी वन विभागाचे हजारो कर्मचारी काम करीत असून त्यासाठी कोट्यवधी रूपये वन विभागाने आजपर्यंत खर्च केले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा भाग छत्तीसगड व तेलंगणा राज्याला लागून आहे. या परिसरात सागवानाचे जंगल मोठ्या प्रमाणात असून गडचिरोली जिल्ह्यातील सागवान संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे भामरागड व सिरोंचा या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सागवानाची तस्करी केल्या जाते. वन विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असले तरी त्यांचे प्रयत्न थीटे पडत असून जंगलतोड वाढतच चालली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते. त्यामुळे वन विभागाने सागवानाच्या झाडांची सर्वाधिक लागवड केली आहे. (नगर प्रतिनिधी)नागरिकांनाही वृक्ष संवर्धन योजनेसाठी प्रोत्साहनसामान्य नागरिकांनीही वृक्ष संवर्धन करावे, यासाठी वन विभागाकडून वृक्ष संवर्धन योजना राबविली जात आहे. सदर योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आहे. या योजनेंतर्गत जंगलातील एक हजार वृक्षांचे संरक्षण करणाऱ्या व्यक्तिस ५० पैसे प्रतिझाड प्रमाणे ५०० रूपये प्रतिमहिना दिला जातो. या योजनेचा लाभ २०१३-१४ अंतर्गत ७४ नागरिकांना व २०१४-१५ मध्ये ३८ नागरिकांना दिला आहे. वृक्ष संवर्धन झाले किंवा नाही, याबाबतचा अहवाल वनरक्षक, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना देतात. त्यानंतर सदर व्यक्तिला या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातो. जंगलतोडीला आळा घालण्यासाठी ही अत्यंत चांगली योजना असून या योजनेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी वन विभागाने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.