शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

केवळ ६१ टक्के वीज ग्राहकांनी भरले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते. विजेचा वापर सरासरीपेक्षा अधिक झाला. बिल मात्र प्रत्यक्षात कमी पाठविण्यात आले. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात रिडींग घेणे सुरू झाले. त्यावेळी उर्वरित वीज बिल पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणचे वाढले टेन्शन : लॉकडाऊनमधील वीज वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीपासून थकीत बिलाची रक्कम वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या चार महिन्यांमधील ३९ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरलेच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज बिल थकल्याने महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते. विजेचा वापर सरासरीपेक्षा अधिक झाला. बिल मात्र प्रत्यक्षात कमी पाठविण्यात आले. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात रिडींग घेणे सुरू झाले. त्यावेळी उर्वरित वीज बिल पाठविण्यात आले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात वीज बिल आल्याने अनेक ग्राहकांना बिल भरणे शक्य झाले नाही. सप्टेंबर महिना उलटूनही काही ग्राहकांनी अजूनपर्यंत वीज बिलाचा भरणा केला नाही.एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरातील ग्राहकांनी १०३.६८ कोटी रुपयांचा वीज वापर केला. पण प्रत्यक्षात ६२ कोटी ७५ लाख एवढीच वसुली झाली आहे. एकूण वीज बिलाच्या केवळ ६०.५२ टक्के एवढीच वसुली झाल्याने महावितरणपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. महावितरणला कर्मचारी, वीज खरेदी, वीज निर्मिती, शासकीय कार्यालयाचा खर्च आदींवर नियमित खर्च करावा लागतो. अगोदरच महावितरणाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यात वीज बिल थकल्याने आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरण आता वीज बिल वसुलीला गती देण्याची शक्यता आहे.वीज माफीच्या चर्चेचा परिणामलॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल काही प्रमाणात माफ केले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाच्या काही मंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात आढावा घेतला असता, वीज बिल माफ करणे शक्य नाही, असा शेरा वित्त विभागाने मारला. त्यानंतर वीज बिल माफ होण्याच्या चर्चा बंद झाल्या. मात्र या चर्चांमुळे क्षमता असलेल्या नागरिकांनीही वीज बिलाचा भरणा केला नाही. आता. पाच महिन्यांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.ग्राहकांकडून वीज बिलाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या पैशातूनच महावितरणचा सर्व खर्च भागविला जाते. चांगली सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलाचा नियमित भरणा करावा. वीज पुरवठा खंडीत करण्याची पाळी महावितरणवर येऊ देऊ नये.- विजय मेश्राम,अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीज