शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

केवळ ६१ टक्के वीज ग्राहकांनी भरले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते. विजेचा वापर सरासरीपेक्षा अधिक झाला. बिल मात्र प्रत्यक्षात कमी पाठविण्यात आले. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात रिडींग घेणे सुरू झाले. त्यावेळी उर्वरित वीज बिल पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणचे वाढले टेन्शन : लॉकडाऊनमधील वीज वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीपासून थकीत बिलाची रक्कम वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या चार महिन्यांमधील ३९ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरलेच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज बिल थकल्याने महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते. विजेचा वापर सरासरीपेक्षा अधिक झाला. बिल मात्र प्रत्यक्षात कमी पाठविण्यात आले. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात रिडींग घेणे सुरू झाले. त्यावेळी उर्वरित वीज बिल पाठविण्यात आले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात वीज बिल आल्याने अनेक ग्राहकांना बिल भरणे शक्य झाले नाही. सप्टेंबर महिना उलटूनही काही ग्राहकांनी अजूनपर्यंत वीज बिलाचा भरणा केला नाही.एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरातील ग्राहकांनी १०३.६८ कोटी रुपयांचा वीज वापर केला. पण प्रत्यक्षात ६२ कोटी ७५ लाख एवढीच वसुली झाली आहे. एकूण वीज बिलाच्या केवळ ६०.५२ टक्के एवढीच वसुली झाल्याने महावितरणपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. महावितरणला कर्मचारी, वीज खरेदी, वीज निर्मिती, शासकीय कार्यालयाचा खर्च आदींवर नियमित खर्च करावा लागतो. अगोदरच महावितरणाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यात वीज बिल थकल्याने आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरण आता वीज बिल वसुलीला गती देण्याची शक्यता आहे.वीज माफीच्या चर्चेचा परिणामलॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल काही प्रमाणात माफ केले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाच्या काही मंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात आढावा घेतला असता, वीज बिल माफ करणे शक्य नाही, असा शेरा वित्त विभागाने मारला. त्यानंतर वीज बिल माफ होण्याच्या चर्चा बंद झाल्या. मात्र या चर्चांमुळे क्षमता असलेल्या नागरिकांनीही वीज बिलाचा भरणा केला नाही. आता. पाच महिन्यांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.ग्राहकांकडून वीज बिलाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या पैशातूनच महावितरणचा सर्व खर्च भागविला जाते. चांगली सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलाचा नियमित भरणा करावा. वीज पुरवठा खंडीत करण्याची पाळी महावितरणवर येऊ देऊ नये.- विजय मेश्राम,अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीज