शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरतीमधील बंदीत ओबीसी व इतर समाजाची होतेय दिशाभूल

By admin | Updated: July 14, 2017 02:08 IST

जिल्ह्यात पेसा कायद्यांतर्गत वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत एसटी वगळता ओबीसी, एससी व इतर गैरआदिवासी

नारायण जांभुळे : गैरआदिवासींवरील अन्याय दूर करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात पेसा कायद्यांतर्गत वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत एसटी वगळता ओबीसी, एससी व इतर गैरआदिवासी समाजाची भरती करण्यावर २०१३ पासून बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी गैरआदिवासी समाजासाठी अन्यायकारक असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी ती बंदी उठविण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता केवळ दिशाभूल करीत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी अ‍ॅड.नारायण जांभुळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.यासंदर्भात माहिती देताना अ‍ॅड. जांभुळे यांनी सांगितले, एसटी प्रवर्गाशिवाय इतर प्रवर्गातील नोकरभरतीवर बंदी घालणारी अधिसूचना राज्याच्या आदिवासी आमदारांच्या सल्लागार समितीने घेतलेल्या ठरावानुसार जारी करण्यात आली आहे. त्यामुळे ही बंदी मागे घेण्याचा आधिकारसुद्धा याच समितीला आहे. आदिवासी राखीव क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे सर्व आदिवासी आमदार या समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. दर सहा महिन्यांनी या समितीची बैठक होते. पण सदर नोकरभरती उठविण्याचा ठराव जिल्ह्यातील कोणत्याही आदिवासी आमदाराने या समितीच्या बैठकीत मांडला नाही. मात्र दुसरीकडे राज्यपालांकडे ही बंदी उठविण्याची मागणी करून ते नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप जांभुळे यांनी केला.आधीच जिल्ह्यात गैरआदिवासी समाजाचे आरक्षण १९ टक्क्यांवरून आधी १३ टक्के आणि नंतर ६ टक्क्यांवर आणून तमाम ओबीसी, एससी, एनटी, ओपन या समाजावर अन्याय झाला आहे. हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात करावे, अशी मागणी त्यांनी केली.सध्या लॉयड्स कंपनीला खननासाठी दिलेल्या सूरजागडच्या पहाडीवर जुना किल्ला आहे. त्यांची परवानगी रद्द करून हा परिसर ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करावा अशी मागणी त्यांनी केली. लॉयड्सच्या प्रकल्पासाठी कोणतेही नोटीफिकेशन न काढताच मुख्यमंत्र्यांच्या हातून घाईगडबडीत भूमिपूजन उरकून प्रकल्पाचा विरोध संपविल्याचे ते म्हणाले.३० जून २०१७ पर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.