शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

२४२ ग्रामपंचायतीत टॉवरची संख्या वाढणार

By admin | Updated: October 27, 2016 01:40 IST

गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या वतीने ग्रामपंचायतीत ब्राँडबँड सेवा जोडणीचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : २३ टॉवर उभारणीस जागा उपलब्ध; ब्राँडबँडचे जाळे पसरणारगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या वतीने ग्रामपंचायतीत ब्राँडबँड सेवा जोडणीचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे. डिसेंबर २०१६ अखेर जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायती ब्राँडबँड सेवेने जोडल्या जातील. जिल्हा प्रशासनाने चांगल्या नेटवर्कसाठी २३ टॉवर उभारणीस जागा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाधिकारी एस. आर. नायक यांनी दिली आहे. जिल्हा समन्वय समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोेनवने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जवळेकर, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले आदी उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क बीएसएनएलचे आहे. काही कंपन्यांचे फोर-जी नेटवर्क उपलब्ध असताना बीएसएनएलचे कव्हरेज कमी आहे, अशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्याकडे लक्ष देण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात १० मोबाईल टॉवरची सेवा सुरू झाली आहे. याशिवाय ४० नव्या टॉवरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यातील २३ टॉवर उभारणीस जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित ठिकाणी येत्या आठ दिवसांत जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. केंद्र सरकारच्या नक्षलग्रस्त भागातील जिल्हे बळकट व सुरक्षित करण्याच्या योजनेत देखील मोबाईल नेटवर्क विस्ताराचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यात हे प्रस्तावित ४० टॉवर असून याअंतर्गत एकूण १०० टॉवरचे काम होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)एटीएमची केंद्रांची संख्या वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना सोय व्हावी व त्यांचा वेळ आणि त्रास कमी व्हावा, याकरिता एटीएम केंद्रांची संख्या वाढविण्यास बँकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिल्या. कुरखेडाच्या पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरावरील बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेचे बाबरे, तहसीलदार अजय चरडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये केवळ ६० एटीएम केंद्र आहेत. यातील बहुतेक केंद्र हे शहरी भागात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वारंवार शहरी भागात यावे लागते, यात वेळ व पैसा खर्च होतो. याची जाणीव बँकांनी ठेवण्याची गरज आहे. जिल्ह्यात किसान क्रेडीड कार्डधारक शेतकऱ्यांची संख्या दीड लाखांहून अधिक आहे. या सर्वांना ५० हजारांपर्यंत पतमर्यादा उपलब्ध आहे. मात्र एटीएम केंद्राअभावी त्यांना सवलत देणे अवघड झाले आहे. अगदी साध्या व्यवहारांसाठी शेतकऱ्यांना शहरी भागात तालुक्याच्या ठिकाणी येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.