शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले; शेतातील रसायनांच्या वापरामुळे जल प्रदूषण वाढले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:56 IST

रासायनिक खतांच्या वापराचा दुष्परिणाम : विषारी रसायनांमुळे पिण्याचे पाणी होतेय दूषित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढत असल्याचे पाणी तपासणीत आढळून आलेले आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्व्हे केला होता. शेतांमध्ये होणारा रसायनांचा वारेमाप वावर, तसेच इतर कारणांनी रसायनांच्या माध्यमातून होणारे जलप्रदूषण, आदी कारणांमुळे पिण्याचे पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे. जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे.

जिल्ह्यात वायू प्रदूषणासह आता जलप्रदूषणही वाढत आहे. विशेषतः शेतातील रासायनिक खतांचे अंश जमिनीतील पाण्यातही उतरत आहेत. जिल्ह्यातील ८ हजार २५० पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी केली असता त्यातील ४२ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले. १६,०८९ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ८ हजार २५० नमुने रासायनिक पद्धतीने, तर ७हजार ८३९ नमुने जैविक पद्धतीने तपासण्यात आले.

बागायतमध्ये जास्त प्रमाणपाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. बागायत क्षेत्रातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलेले आहे.

३७३ नमुने पिण्याअयोग्यजिल्ह्याच्या बाराही तालुक्यांच्या जलस्रोतातून घेण्यात आलेले एकूण ३७३ नमुने पिण्याअयोग्य आहेत. यात रासायनिकचे १८२, तर जैविक तपासणीतील १९१ पाणी नमुन्यांचा समावेश आहे.

फ्लोराइडही आढळलेअनेक गावांना नदी, नाले व तलाव परिसरातून नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शेती पिकांसाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात.

आरोग्यावर नायट्रेटचे काय परिणाम होतात ?पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्यास रक्ताभिसरणासंबंधातील आजार होतात. लहान मुलांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुले दगावू शकतात. पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट असणे धोकादायकच ठरते, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे जलप्रदूषण रोखणे गरजेचे आहे.

"शेतात रासायनिक खतांचा वापर, तसेच विषारी रसायनांच्या वापरासह अन्य कारणांनी जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे भूमी, वायू व आता जलप्रदूषणही वाढत आहे."- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणGadchiroliगडचिरोली