शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
2
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
3
भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video
4
उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात
5
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
6
धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर
7
Mumbai: चेंबूर परिसरात बीएमसीचा कचरावाहू ट्रक उलटला; एकाचा मृत्यू, दोन जखमी
8
बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले
9
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
10
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
11
करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…
12
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
13
जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!
14
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
15
हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
17
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
18
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
19
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
20
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली

जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले; शेतातील रसायनांच्या वापरामुळे जल प्रदूषण वाढले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:56 IST

रासायनिक खतांच्या वापराचा दुष्परिणाम : विषारी रसायनांमुळे पिण्याचे पाणी होतेय दूषित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढत असल्याचे पाणी तपासणीत आढळून आलेले आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्व्हे केला होता. शेतांमध्ये होणारा रसायनांचा वारेमाप वावर, तसेच इतर कारणांनी रसायनांच्या माध्यमातून होणारे जलप्रदूषण, आदी कारणांमुळे पिण्याचे पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे. जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे.

जिल्ह्यात वायू प्रदूषणासह आता जलप्रदूषणही वाढत आहे. विशेषतः शेतातील रासायनिक खतांचे अंश जमिनीतील पाण्यातही उतरत आहेत. जिल्ह्यातील ८ हजार २५० पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी केली असता त्यातील ४२ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले. १६,०८९ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ८ हजार २५० नमुने रासायनिक पद्धतीने, तर ७हजार ८३९ नमुने जैविक पद्धतीने तपासण्यात आले.

बागायतमध्ये जास्त प्रमाणपाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. बागायत क्षेत्रातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलेले आहे.

३७३ नमुने पिण्याअयोग्यजिल्ह्याच्या बाराही तालुक्यांच्या जलस्रोतातून घेण्यात आलेले एकूण ३७३ नमुने पिण्याअयोग्य आहेत. यात रासायनिकचे १८२, तर जैविक तपासणीतील १९१ पाणी नमुन्यांचा समावेश आहे.

फ्लोराइडही आढळलेअनेक गावांना नदी, नाले व तलाव परिसरातून नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शेती पिकांसाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात.

आरोग्यावर नायट्रेटचे काय परिणाम होतात ?पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्यास रक्ताभिसरणासंबंधातील आजार होतात. लहान मुलांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुले दगावू शकतात. पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट असणे धोकादायकच ठरते, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे जलप्रदूषण रोखणे गरजेचे आहे.

"शेतात रासायनिक खतांचा वापर, तसेच विषारी रसायनांच्या वापरासह अन्य कारणांनी जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे भूमी, वायू व आता जलप्रदूषणही वाढत आहे."- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणGadchiroliगडचिरोली