शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले; शेतातील रसायनांच्या वापरामुळे जल प्रदूषण वाढले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:56 IST

रासायनिक खतांच्या वापराचा दुष्परिणाम : विषारी रसायनांमुळे पिण्याचे पाणी होतेय दूषित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढत असल्याचे पाणी तपासणीत आढळून आलेले आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्व्हे केला होता. शेतांमध्ये होणारा रसायनांचा वारेमाप वावर, तसेच इतर कारणांनी रसायनांच्या माध्यमातून होणारे जलप्रदूषण, आदी कारणांमुळे पिण्याचे पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे. जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे.

जिल्ह्यात वायू प्रदूषणासह आता जलप्रदूषणही वाढत आहे. विशेषतः शेतातील रासायनिक खतांचे अंश जमिनीतील पाण्यातही उतरत आहेत. जिल्ह्यातील ८ हजार २५० पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी केली असता त्यातील ४२ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले. १६,०८९ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ८ हजार २५० नमुने रासायनिक पद्धतीने, तर ७हजार ८३९ नमुने जैविक पद्धतीने तपासण्यात आले.

बागायतमध्ये जास्त प्रमाणपाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. बागायत क्षेत्रातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलेले आहे.

३७३ नमुने पिण्याअयोग्यजिल्ह्याच्या बाराही तालुक्यांच्या जलस्रोतातून घेण्यात आलेले एकूण ३७३ नमुने पिण्याअयोग्य आहेत. यात रासायनिकचे १८२, तर जैविक तपासणीतील १९१ पाणी नमुन्यांचा समावेश आहे.

फ्लोराइडही आढळलेअनेक गावांना नदी, नाले व तलाव परिसरातून नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शेती पिकांसाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात.

आरोग्यावर नायट्रेटचे काय परिणाम होतात ?पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्यास रक्ताभिसरणासंबंधातील आजार होतात. लहान मुलांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुले दगावू शकतात. पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट असणे धोकादायकच ठरते, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे जलप्रदूषण रोखणे गरजेचे आहे.

"शेतात रासायनिक खतांचा वापर, तसेच विषारी रसायनांच्या वापरासह अन्य कारणांनी जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे भूमी, वायू व आता जलप्रदूषणही वाढत आहे."- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणGadchiroliगडचिरोली