शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

४०८ जीर्ण वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:52 IST

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील २५१ शाळांमधील ४०८ वर्गखोल्या जीर्ण असून या इमारतींचे निर्लेखन झाले नाही व दुसरी वर्गखोलीही बांधून मिळाली नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींमध्येच विद्यार्थी अध्यापनाचे धडे गिरवत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी येथील शाळेची इमारत २८ आॅगस्ट रोजी कोसळून तीन विद्यार्थी ठार झाले. अशीच घटना गडचिरोली जिल्ह्यातही ...

ठळक मुद्देजीवितहानीचा धोका : इमारत निर्लेखनास चालढकल

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील २५१ शाळांमधील ४०८ वर्गखोल्या जीर्ण असून या इमारतींचे निर्लेखन झाले नाही व दुसरी वर्गखोलीही बांधून मिळाली नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींमध्येच विद्यार्थी अध्यापनाचे धडे गिरवत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी येथील शाळेची इमारत २८ आॅगस्ट रोजी कोसळून तीन विद्यार्थी ठार झाले. अशीच घटना गडचिरोली जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्याच्या निर्मितीनंतर शासनाने गाव तिथे शाळा स्थापन केली. या कालावधीतील गडचिरोली जिल्ह्यात अनेक शाळा आहेत. या शाळांच्या इमारती कौलारू आहेत. काळाच्या ओघात कौलारू इमारतीचे आळे, फाटे कुजले आहेत. त्याचबरोबर काही शाळांच्या भिंतींचे प्लास्टर निघाल्याने मोठमोठे बोगदे पडले आहेत. भिंतीही कोसळण्याचा धोका आहे. शाळेची इमारत पाडण्यापूर्वी तिचे शासकीय नियमाप्रमाणे निर्लेखन करणे आवश्यक आहे. मात्र निर्लेखनाची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने बहुतांश इमारतीचे निर्लेखनच करण्यात आले नाही. जुनी इमारत निर्लेखीत झाली नसल्याने त्या शाळांना नवीन इमारती बांधून देण्यास अडचण निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण २५१ शाळांच्या ४०८ वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. मात्र त्यांचे निर्लेखन झाले नसल्याने यापैकी काही शाळांमध्ये वर्ग सुध्दा भरविले जात आहेत.निर्लेखन प्रस्तावाचा पाच टप्प्यांमधून प्रवासशाळेची जीर्ण इमारत निर्लेखीत करण्याची पध्दती अतिशय किचकट आहे. मुख्याध्यापकांकानी निर्लेखनाचा नमुना भरून सदर प्रस्ताव गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करायचा असतो. गट शिक्षणाधिकारी प्रस्तावाची शहानिशा करून सदर प्रस्ताव शाखा अभियंता यांच्याकडे पाठवतात. शाखा अभियंता प्रत्यक्ष भेट देऊन शाळेची पाहणी करतात. त्यानंतर सदर प्रस्ताव संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. संवर्ग विकास अधिकारी तो प्रस्ताव पंचायत समितीच्या सभेत ठेवतात. पंचायत समितीची मंजूर मिळाल्यानंतर प्रस्ताव कार्यकारी अभियंता व शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. कार्यकारी अभियंता पुन्हा सदर इमारतीला भेट देऊन पाहणी करतात. इमारत जीर्ण आढळल्यास स्वाक्षरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविली जाते. या सर्व प्रक्रियेत जवळपास पाच टप्पे आहेत व पाचही टप्प्यांवर शहानिशा केली जाते. परिणामी मुख्याध्यापकांनी तयार केलेला प्रस्ताव मध्यंतरी कुणाकडे लटकेल हे सांगता येत नाही. या टप्प्यांमुळेच अनेक प्रस्ताव मध्येच लटकले असल्याचा अनुभवही आला आहे. अर्ज दाखल करण्याचे टप्पे कमी केल्यास व जबाबदारी निश्चित झाल्यास प्रक्रियेला वेग येईल.