शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
2
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
3
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
4
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
5
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
6
सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
7
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
8
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
9
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
10
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
11
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
12
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
13
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
14
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
15
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
16
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
17
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
18
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
19
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
20
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

आरमोरी तालुक्यातील तलाव बोड्या अजूनही कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST

आरमोरी तालुक्यात सिंचनाची फारशी सुविधा नाही त्यामुळे तालुक्यातील ७० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी आरमोरी ...

आरमोरी तालुक्यात सिंचनाची फारशी सुविधा नाही त्यामुळे तालुक्यातील ७० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी आरमोरी तालुक्यात पावसाला जोर नाही. शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली तेव्हापासूनच तर आजपर्यंत म्हणावा तसा पाऊस पडला नाही. दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील मामा तलाव, नाले, बंधारे व बोड्या पावसाच्या पाण्याने फुल्ल व्हायच्या मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे तलाव बोड्यात ठणठणाट आहे.

आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी, शेततळे बांधले. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअर मारले त्यामुळे ते कसेतरी आपले पीक वाचवतील; परंतु ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची सिंचन सुविधा नाही, असे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांची अडचण होणार आहे. तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांना गावशेजारी असलेल्या मामा तलावाचे पाणी निस्तार हक्काप्रमाणे शेतीला लागू आहे मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नसल्याने तेही अजून भरले नाही. त्यामुळे पाऊस असाच पुढेही हुलकावणी देत राहिला तर पुढे धान पिकाला कुठले पाणी द्यायचे, अशी चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे. आकाशात जमणारे काळेभोर ढग पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात. मात्र प्रत्यक्षात शेतात साचणार असा पाऊस येत नाही.

बाॅक्स

गतवर्षीही बसला फटका

मागील वर्षी कोरोनाच्या संकटाने शेतकऱ्यांचा रोजगार बुडाला त्यानंतर गतवर्षी आलेल्या महापुराने धान पिके बुडून राहिल्याने पिकाची माती झाली. जे त्यातून सावरले त्यांनाही विविध रोगाच्या प्रादुर्भावाने पछाडले परिणामी मागील वर्षी उत्पन्नात मोठी घट झाली. झालेला खर्चही भरून निघाला नाही. दरवर्षी दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षीही चटके बसायला सुरुवात झाली आहे.