शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

आरमोरी तालुक्यातील तलाव बोड्या अजूनही कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST

आरमोरी तालुक्यात सिंचनाची फारशी सुविधा नाही त्यामुळे तालुक्यातील ७० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी आरमोरी ...

आरमोरी तालुक्यात सिंचनाची फारशी सुविधा नाही त्यामुळे तालुक्यातील ७० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी आरमोरी तालुक्यात पावसाला जोर नाही. शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली तेव्हापासूनच तर आजपर्यंत म्हणावा तसा पाऊस पडला नाही. दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील मामा तलाव, नाले, बंधारे व बोड्या पावसाच्या पाण्याने फुल्ल व्हायच्या मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे तलाव बोड्यात ठणठणाट आहे.

आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी, शेततळे बांधले. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअर मारले त्यामुळे ते कसेतरी आपले पीक वाचवतील; परंतु ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची सिंचन सुविधा नाही, असे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांची अडचण होणार आहे. तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांना गावशेजारी असलेल्या मामा तलावाचे पाणी निस्तार हक्काप्रमाणे शेतीला लागू आहे मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नसल्याने तेही अजून भरले नाही. त्यामुळे पाऊस असाच पुढेही हुलकावणी देत राहिला तर पुढे धान पिकाला कुठले पाणी द्यायचे, अशी चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे. आकाशात जमणारे काळेभोर ढग पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात. मात्र प्रत्यक्षात शेतात साचणार असा पाऊस येत नाही.

बाॅक्स

गतवर्षीही बसला फटका

मागील वर्षी कोरोनाच्या संकटाने शेतकऱ्यांचा रोजगार बुडाला त्यानंतर गतवर्षी आलेल्या महापुराने धान पिके बुडून राहिल्याने पिकाची माती झाली. जे त्यातून सावरले त्यांनाही विविध रोगाच्या प्रादुर्भावाने पछाडले परिणामी मागील वर्षी उत्पन्नात मोठी घट झाली. झालेला खर्चही भरून निघाला नाही. दरवर्षी दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षीही चटके बसायला सुरुवात झाली आहे.