शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीला उद्योगांची प्रतीक्षा

By admin | Updated: August 13, 2016 01:41 IST

शहरालगत सुमारे ८१.७३ हेक्टर जागेवर असलेल्या एमआयडीसीमधील निम्म्याहून अधिक भूखंड उद्योगांविना पडून आहेत.

 १६६ पैकी १२६ भूखंड रिकामे : अनेक सवलतीनंतरही जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये उदासीनता गडचिरोली : शहरालगत सुमारे ८१.७३ हेक्टर जागेवर असलेल्या एमआयडीसीमधील निम्म्याहून अधिक भूखंड उद्योगांविना पडून आहेत. अनेकांनी भूखंडाची मालकी घेतली आहे. मात्र त्यांच्यावर कोणतेही उद्योग सुरू केले नाहीत. एकूण १६६ भूखंडांपैकी केवळ ४० भूखंडांवरच उद्योग सुरू असल्याची विदारक स्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली येथे एकमेव एमआयडीसी आहे. या एमआयडीसीमध्ये एकूण १६६ भूखंड तयार करण्यात आले आहेत. या भूखंडापैकी केवळ ४० भूखंडावर उप्तादन सुरू आहे. १५ भूखंडांवरील उद्योग बंद पडले आहेत. दोन भूखंडावर उद्योग निर्मितीसाठी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. चार भूखंडावरील बांधकाम अर्ध्यावरच सोडण्यात आले आहे. सात भूखंडावर बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. एक वर्षापूर्वी ६२ भूखंडांचे वाटप निरनिराळ्या उद्योगांना करण्यात आले आहे. एक महिन्यापूर्वी ३१ भूखंड आणखी मंजूर करण्यात आले आहेत. पाच भूखंड व्यापारी तत्वावर दिले जात असल्याने त्यांची ई-निविदा काढून सोडत करण्यात येते. एमआयडीसी प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार १६६ पैकी केवळ ४० भूखंडांवर उद्योग सुरू आहेत. तर १२६ भूखंड उद्योगाविना रिकामे पडून आहेत. नागपूर, चंद्रपूर सारख्या ठिकाणी एमआयडीसीची जागा मिळविणे कठीण होते. कित्येक उद्योजकांना एमआयडीसीमध्ये जागा मिळत नसल्याने व्यावसायिक दराची जागा खरेदी करून उद्योग उभारावा लागतो. तर गडचिरोलीत मुबलक जागा उपलब्ध असतानाही उद्योजक उद्योग निर्माण करण्यासाठी तयार नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. एमआयडीसीकडील सुमारे १७ हेक्टर जागा पोलीस विभागाला हेलिपॅडसाठी देण्यात आली आहे. सुरूवातीला उद्योजकांनी हेलिपॅडसाठी जागा देऊ नये, यासाठी विरोध दर्शविला होता. मात्र उद्योजकांच्या विरोधाला न जुमानता एमआयडीसी प्रशासनाने सदर जागा पोलीस विभागाला दिली आहे. त्याचबरोबर तीन इमारती सीआरपीएफसाठी देण्यात आल्या आहेत. (नगर प्रतिनिधी) नाममात्र दरात मिळते जागा उद्योजकांना सर्वप्रथम जागेसाठी संघर्ष करावा लागतो. जागा जरी खरेदी केली तरी त्या जागेवर पाणी, वीज, मजूर यारख्या सुविधा मिळणे कठीण होते. या सर्व सुविधा उद्योजकांना मिळाव्या यासाठी एमआयडीसीची स्थापना करण्यात आली आहे. एमआयडीसीमधील जागा केवळ १० रूपये स्के.मीटर दराने उपलब्ध करून दिल्या जाते. उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, हा या मागील उद्देश आहे. जागा स्वस्त व नाममात्र दरात मिळत असल्याने अनेक नागरिक जागा मिळविण्यासाठी धडपडतात. मात्र एकदा जागा मिळाल्यानंतर या जागेवर उद्योग स्थापन करीत नाही. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर पाच वर्ष त्या जागेवर उद्योग स्थापन न झाल्यास सदर जागा एमआयडीसी प्रशासन वापस घेते. अशा पध्दतीने दरवर्षी २० ते ३० भूखंड परत घेतले जातात. जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रोत्साहन अनुदान घेतल्यानंतर सदर उद्योग किमान सात वर्ष व्यवस्थित चालणे आवश्यक आहे. मात्र काही उद्योग सात वर्षांपूर्वीच बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जिल्हा उद्योग केंद्राने दिलेले अनुदान व त्यावरील १० टक्के व्याज वसूल करण्यात येते. जिल्हा उद्योग केंद्राने संबंधित उद्योजकांना नोटीस पाठविले असून रक्कम भरण्याविषयी पाठपुरावा केला जात आहे. -एम. एन. परिहार, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली ३९ उद्योगांना यावर्षी मिळणार प्रोत्साहन अनुदान पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाला १७ उद्योजकांना ३३.२३ लाख रूपये अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर जिल्हा उद्योग केंद्राला २२ उद्योजकांना ४४ लाख रूपये अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. नवीन उद्योग स्थापन करू इच्छिणाऱ्या उद्योजकाला बँकेच्या मार्फतीने कर्ज सुध्दा उपलब्ध करून दिले जाते. या कर्जासोबतच जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फतीने अनुदानही दिले जाते. अनुदान लाटून उद्योग बंद शासनाच्या वतीने उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. जिल्हा उद्योग केंद्राने एमआयडीसीमधील उद्योजकांना लाखो रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत १९९३ मध्ये चार उद्योजकांना १२ लाख ७६ हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले. २००१ मध्ये सात उद्योजकांना १ कोटी ३९ लाख ४० हजार रूपयांचे अनुदान दिले. तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत चार उद्योजकांना २६ लाख रूपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले. मात्र यापैकी असीट पेन्ट इंडस्ट्री, कॅस्ट्रॉल आईस फॅक्ट्री, प्लाझर इंडस्ट्रीज व न्यूझीविड सीडस् लिमिटेड हे चार उद्योग बंद पडले आहेत. या उद्योकांकडे ५२ लाख रूपये व त्यावरील व्याज थकले आहे.