शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

इतिहासकालीन सिरोंचाची दुरवस्था

By admin | Updated: July 14, 2014 02:07 IST

ब्रिटिशांच्या कालावधीत नावारूपास आलेले व जिल्ह्यात

नागरिकांमध्ये तीव्र रोष : शहरात पसरले आहे घाणीचे साम्राज्यनागभूषणम चकिनारपूवार सिरोंचाब्रिटिशांच्या कालावधीत नावारूपास आलेले व जिल्ह्यात ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या सिरोंचा शहराची दूरवस्था झाली असून शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाविषयी स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ब्रिटिशांच्या कालावधीत सिरोंचा हे प्रमुख शहर होते. ब्रिटिश सिरोंचा येथूनच परिसराचा कारभार सांभाळत होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांना राहण्याची आलिशान व्यवस्था व्हावी, यासाठी या ठिकाणी विश्रामगृह बांधण्यात आले होते. ६० वर्षापूर्वीच ब्रिटिशांची राजवट गेली असली तरी ब्रिटिश राजवटीची आठवण देणारा विश्रामगृह मात्र या ठिकाणी आजही कायम आहे. अनेक पर्यटक सिरोंचा परिसरात आल्यानंतर या विश्रामगृहाला अवश्य भेट देऊन त्या ठिकाणी विश्रांतीस राहतात. अशा या ऐतिहासिक वैभव प्राप्त झालेल्या गावाच्या विकासाकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मागील ४ वर्षात ग्रामपंचायत प्रशासनाने विकासाची वाट लावली आहेत. प्रत्येक वार्डातील रस्त्यावर व नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसू लागले आहे. याबद्दल नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतचे पदाधिकारी व अधिकारी नागरिक आपले काहीच करू शकत नाही या अविर्भावात वावरू लागले आहेत. शहरातील संपूर्ण नाल्या तुंबल्या आहेत. मागील ३ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने ग्रामपंचायतीची पोल उघड केली आहे. पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने सदर पाणी नागरिकांच्या अंगणात किंवा रस्त्यावर जमा झाले आहे. काही वार्डात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बहुतांश विकासाची कामे ठेकेदारी पध्दतीने केली जात असल्याने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी कमिशन घेऊन मोकळे होत आहेत. बहुतांश पैसे कमीशन देण्यातच खर्च होत असल्याने व ठेकेदाराला बोलणाराही कोणीही उरला नसल्याने मन वागेल त्या पध्दतीने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीने नाल्यांचा उपसा करणे आवश्यक आहे. मात्र या गंभीर बाबीकडे सिरोंचा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके निर्माण झाले आहेत. यातून मलेरिया, डेंग्यू, अतिसार रोगांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतविषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे.