शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

शेतकºयांची एसडीओ कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 21:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना आर्थिक मदत व सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीला घेऊन देवरी तालुक्यातील हजारो शेतकºयांनी गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकºयांच्या या विराट मोर्चाने पोलिसांसह प्रशासनाला चांगलाचा घाम ...

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करुन सरसकट कर्जमाफीची मागणी : मुख्यमंत्र्यांच्या नावे दिले निवेदनप्रमुख मागण्यादेवरी तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषीत कराशेतकºयांचा सातबारा कोरा करुन पीक कर्ज व शेती अवजाराचे कर्ज माफ करा.खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील ६८ गावांच्या शेतकºयांना पिकांची नुकसान भरपाई व पिक विमा दावेची रक्कम त्वरित देण्यात यावी.जनावरांसाठी चाºयाची व्यवस्था करण्यात यावी.प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला प्रती युनिट मागे १५ किलो अन्नधान्य देण्यात यावे.कर्जमाफी व पिक विम्याचे आॅफ लाईन अर्ज मंजूर करण्यात यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना आर्थिक मदत व सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीला घेऊन देवरी तालुक्यातील हजारो शेतकºयांनी गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकºयांच्या या विराट मोर्चाने पोलिसांसह प्रशासनाला चांगलाचा घाम फोडला होता.कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेच्या नेतृत्वात हा मोर्चा नव्हता तर सर्व शेतकºयांनीच या मोर्चाचे नेतृत्त्व केले हे विशेष. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, पीक विम्याची रक्कम योग्य लाभार्थ्यांना मिळालीच पाहिजे, विमा कंपन्याकडून होणारी शेतकºयांची आर्थिक पिळवणूक बंद करा, मनरेगाची कामे त्वरीत सुरू करा, अशा घोषणा देत परसटोला देवरी येथून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय कार्यालयाजवळ पोहचला. त्यानंतर देवरी तालुका शेतकरी व शेतमजूर संघटना व शेतकºयांच्या शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे यांना दिले.शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रभान सोनबोईर, संघटक रियाज खान, सचिव महेंद्र मोहबंशी, सहसंघटक जीवनलाल सलामे, दिलीप अंबरवाडे, उत्तम मरकार, रामेश्वर पदाम, रंजित कसाम यांचा समावेश होता.या वेळी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवडे, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तहसीलदार विजय बोरुडे उपस्थित होते. देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हजारोंच्या संख्येत शेतकरी व शेतमजुरांनी काढलेल्या या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी तर नव्हेतच पण कोणत्याही पक्षाचे पोस्टर, बॅनर सुद्धा नव्हते हे विशेष. मोर्चा यशस्वी करण्यासाठी पुनाराम तुलावी, धन्नुलाल उके, कोमल रणबाकडा, लखन दुधकावरा, प्रल्हाद दुधनाग, अनिल वालद, धनसिंग उईके, मंदू बाकचोरिया, दिलीप सोनझाड, गणेश सोनबोईर, बाबुराव हिडको, अमरदास सोनबोईर, इमला बाळाबाग, रामजी हिरवाणी, दिलीप पडोले, लक्ष्मीशंकर मळकाम, पाटणकर, चिंता मडावी यांनी सहकार्य केले.आमदारांनी घेतली दखलतालुक्यातील शेतकºयांनी काढलेल्या मोर्चाची आमदार संजय पुराम यांनी दखल घेतली. शेतकºयांच्या मागण्यांची दखल घेत त्या मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.क्षणचित्रेतालुक्यातील दुर्गम भागातील शेतकºयांचा समावेशदोनशेहून अधिक ट्रॅक्टरसह शेतकºयांचा सहभागस्वंयस्फूर्तपणे शेतकºयांचा सहभागशेतकºयांनीच केले नेतृत्त्वकुठलेही बॅनर, फलक नाही