शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जंगलातील आगींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: May 30, 2017 00:46 IST

मानवाने खूप प्रगती केली असली तरी सामाजिक प्रगती मंदावली आहे.

जंगलतोडही कारणीभूत : तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारही लावतात वणवेलोकमत न्यूज नेटवर्ककोरची : मानवाने खूप प्रगती केली असली तरी सामाजिक प्रगती मंदावली आहे. भौतिक सुखाकरिता मानवी मूल्यांची पायमल्ली होत असल्याने निसर्गप्रेम लोप पावत आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण, शेतीविकास, जैविक विकास, अर्थकारण आदी आधुनीकीकरणाच्या नावाखाली जंगलतोड आणि जंगलाना आगी लावणे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.सध्या तेंदूपत्ता हंगाम जिल्हाभरात सुरु आहे. यामुळे दुर्गम भागातील आदिवासी, शेतकरी, मजुरांना रोजगार प्राप्त होत आहे, हे सत्य असले तरी अल्प पैशाच्या लालसेपोटी तेंदूपत्ता ठेकेदारांसोबत संगनमत करुन जास्त व दर्जेदार तेंदू पाने मिळण्याच्या हव्यासापोटी अख्खे जंगल भस्मसात केल्या जात आहे. ठेकेदारांच्या खुटकटाईच्या पैशाची बचत होत असली तरी यामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होत आहे. जंगलाला आगी लावल्यामुळे जंगलातील गवतवर्गीय वनस्पती, कीटक, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, पक्षी आदी वन्यप्राण्यांना याची झळ बसत आहे. यामुळे जंगलातील श्वापदे गावाकडे धाव घेत आहेत. देसाईगंज-आरमोरी मार्गावर कित्येकांना वाघाचे दर्शन होत आहे. हे त्याचेच द्योतक आहे. पर्यावरणाचे अर्थात वृक्षांचे संरक्षण करणे आणी संवर्धन करणे हे सजीव सृष्टीच्या भविष्यकालीन अस्तित्वासाठी गरजेचे आहे. लोकसंख्या जितक्या वेगाने वाढत आहे तितक्या वेगाने स्त्रोत वाढू शकले नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे प्रामुख्याने हवा, पाणी, जमीन, वनस्पती, मृदा या स्त्रोतांवर विपरीत परिणाम आपसूकच पडतांना दिसून येत आहे. दूषितीकरण हरितगृह परिणाम, वातावरण होणारा बदल, ओझोन वायूचा होणारा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थाचा असमतोल, पशुप्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आजपर्यंत तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांची ठेकेदारांकडून पिळवणूक झाली. शासनाच्या हे लक्षात आले. ही पिळवणूक थांबावी व मजुरांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने ग्रामसभांना हे अधिकार दिले. जंगल जाळण्याचे अधिकार त्यांना दिलेले नाही, हे येथे महत्त्वाचे. मात्र यावर्षी सदर तेंदूपत्ता तोडाईच्या नावाखाली कित्येक जंगले नष्ट केली गेली आहेत. मार्च महिन्यात खुटकटाई होते. निसर्गाचे तापमान कमीच असते. मग याच महिन्यात जंगलाना आगी का लागतता हे आता सर्वश्रूत झाले आहे. जंगल जळण्याला एकटा ठेकेदार जबाबदार नाही तर तेवढेच जबाबदार ग्रामसभेचे पदाधिकारीही आहेत. जंगलतोडीचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास वनसंपती कायमची नष्ट होईल.