शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जंगलातील आगींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: May 30, 2017 00:46 IST

मानवाने खूप प्रगती केली असली तरी सामाजिक प्रगती मंदावली आहे.

जंगलतोडही कारणीभूत : तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारही लावतात वणवेलोकमत न्यूज नेटवर्ककोरची : मानवाने खूप प्रगती केली असली तरी सामाजिक प्रगती मंदावली आहे. भौतिक सुखाकरिता मानवी मूल्यांची पायमल्ली होत असल्याने निसर्गप्रेम लोप पावत आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण, शेतीविकास, जैविक विकास, अर्थकारण आदी आधुनीकीकरणाच्या नावाखाली जंगलतोड आणि जंगलाना आगी लावणे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.सध्या तेंदूपत्ता हंगाम जिल्हाभरात सुरु आहे. यामुळे दुर्गम भागातील आदिवासी, शेतकरी, मजुरांना रोजगार प्राप्त होत आहे, हे सत्य असले तरी अल्प पैशाच्या लालसेपोटी तेंदूपत्ता ठेकेदारांसोबत संगनमत करुन जास्त व दर्जेदार तेंदू पाने मिळण्याच्या हव्यासापोटी अख्खे जंगल भस्मसात केल्या जात आहे. ठेकेदारांच्या खुटकटाईच्या पैशाची बचत होत असली तरी यामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होत आहे. जंगलाला आगी लावल्यामुळे जंगलातील गवतवर्गीय वनस्पती, कीटक, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, पक्षी आदी वन्यप्राण्यांना याची झळ बसत आहे. यामुळे जंगलातील श्वापदे गावाकडे धाव घेत आहेत. देसाईगंज-आरमोरी मार्गावर कित्येकांना वाघाचे दर्शन होत आहे. हे त्याचेच द्योतक आहे. पर्यावरणाचे अर्थात वृक्षांचे संरक्षण करणे आणी संवर्धन करणे हे सजीव सृष्टीच्या भविष्यकालीन अस्तित्वासाठी गरजेचे आहे. लोकसंख्या जितक्या वेगाने वाढत आहे तितक्या वेगाने स्त्रोत वाढू शकले नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे प्रामुख्याने हवा, पाणी, जमीन, वनस्पती, मृदा या स्त्रोतांवर विपरीत परिणाम आपसूकच पडतांना दिसून येत आहे. दूषितीकरण हरितगृह परिणाम, वातावरण होणारा बदल, ओझोन वायूचा होणारा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थाचा असमतोल, पशुप्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आजपर्यंत तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांची ठेकेदारांकडून पिळवणूक झाली. शासनाच्या हे लक्षात आले. ही पिळवणूक थांबावी व मजुरांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने ग्रामसभांना हे अधिकार दिले. जंगल जाळण्याचे अधिकार त्यांना दिलेले नाही, हे येथे महत्त्वाचे. मात्र यावर्षी सदर तेंदूपत्ता तोडाईच्या नावाखाली कित्येक जंगले नष्ट केली गेली आहेत. मार्च महिन्यात खुटकटाई होते. निसर्गाचे तापमान कमीच असते. मग याच महिन्यात जंगलाना आगी का लागतता हे आता सर्वश्रूत झाले आहे. जंगल जळण्याला एकटा ठेकेदार जबाबदार नाही तर तेवढेच जबाबदार ग्रामसभेचे पदाधिकारीही आहेत. जंगलतोडीचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास वनसंपती कायमची नष्ट होईल.