शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

गतवर्षीपेक्षा वीजवापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:44 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे चार दशलक्ष युनिट विजेचा वापर वाढला आहे. ग्राहकसंख्या वाढण्याबरोबर दिवसेंदिवस प्रत्येकाच्या घरी विजेवर चालणारी साधने वाढल्याने विजेचा वापर वाढला आहे.

ठळक मुद्देमागणीत ७.५४ टक्क्यांनी वाढ : नवीन ग्राहकांसह उपकरणेही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे चार दशलक्ष युनिट विजेचा वापर वाढला आहे. ग्राहकसंख्या वाढण्याबरोबर दिवसेंदिवस प्रत्येकाच्या घरी विजेवर चालणारी साधने वाढल्याने विजेचा वापर वाढला आहे.घरातील बहुतांश स्वयंचलीत उपकरणे विजेवर चालत असल्याने वीज ही अत्यावश्यक गरज बनली आहे. हा दृष्टीकोन समोर ठेवूनच केंद्र व राज्य शासनातर्फे प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचवून प्रत्येक नागरिकाला वीज जोडणी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे ग्राहक संख्येमध्ये वाढ होऊन विजेचा वापर वाढत चालला आहे.त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर प्रत्येक व्यक्ती अधिकाधिक विजेवर चालणारी घरगुती साधने खरेदी करते. त्यामुळेही विजेचा वापर वाढत चालला आहे. वीज विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०१७ एप्रिल या महिन्यात गडचिरोली सर्कल अंतर्गत ५४.२४ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला होता. तर २०१८ मधील एप्रिल महिन्यात ५८.३३ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ४.०९ दशलक्ष युनिट वीजचा वापर वाढला आहे.विजेवर चालणारी बहुतांश उपकरणे सुखोपयोगी कामांसाठी वापरली जातात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारल्याबरोबर संबंधित व्यक्ती सदर साधने खरेदी करीत असल्याने विजेचा वापर आपसुकच वाढणार आहे. विजेचा अपव्यय न करता वाढलेला वापर हा समाजाच्या प्रगतीचे लक्षण मानल्या जाते. मात्र वीज निर्मितीमुळे होणारा पाणी व दगडी कोळशाचा वापर लक्षात घेता विजेचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.वर्षभरात १० हजार ३८७ नवीन ग्राहकलोकसंख्या वाढीबरोबरच वीज ग्राहकांच्या संख्येत भर पडते. शहरातील नवीन वस्त्यांमध्ये वीज पुरवठा झाल्यानंतर ग्राहकांची संख्या वाढते. मागील वर्षभरात जिल्हाभरातील १० हजार ३८७ नागरिकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. नवीन ग्राहक वाढल्याने विजेची मागणी वाढून विजेचा वापर वाढला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास २५० गावे अंधारात होती. त्यापैकी वर्षभरात वीज विभागाने १५० गावांना वीज पुरवठा केला आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये विजेचा वापर होऊन विजेची मागणी वाढली आहे.गडचिरोली सर्कल कार्यालयांतर्गत एकूण २ लाख ५५ हजार ५७२ घरगुती, ११ हजार ८३१ व्यावसायिक, २ हजार १८१ औद्योगिक ग्राहक आहेत.३ हजार ६६३ मीटर उपलब्धमध्यंतरी वीज मीटरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे डिमांड भरूनही नागरिकांना वीज मीटर उपलब्ध होत नव्हते. वीज जोडणी मिळत नसल्याने नागरिकांना घर बांधूनही अंधारातच राहावे लागत होते. यावर्षी मात्र वीज विभागाने पुरेसे मीटर उपलब्ध करून दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी तीन हजार मीटर व शहरी भागासाठी ६६३ वीज मीटर उपलब्ध झाले आहेत.वीज मीटर उपलब्ध असले तरी वीज विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार वीज मीटर लावून देताना विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :electricityवीज