शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

कर्ज वितरण कासवगतीनेच

By admin | Updated: June 17, 2016 01:19 IST

खरीप हंगामाच्या कामांना वेग आला असला तरी कर्ज वितरणाची गती मात्र धिम्मीच असल्याचे दिसून येते.

४० कोटींचे कर्ज वाटप : जिल्हाभरातील १० हजार ४२९ शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : खरीप हंगामाच्या कामांना वेग आला असला तरी कर्ज वितरणाची गती मात्र धिम्मीच असल्याचे दिसून येते. १० जून पर्यंत जिल्हाभरातील फक्त १० हजार ४२९ शेतकऱ्यांना ३९ कोटी २९ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. आधुनिक पध्दतीने शेती करण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. बियाणे, खते व मजुरांची मजुरी सुध्दा वाढली आहे. शेतीसाठी लाखो रूपये खर्च येतो. एवढा पैसा शेतकऱ्यांजवळ राहत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्याला सावकाराकडून किंवा बचतगटाकडून कर्ज काढावे लागते. हे कर्ज अत्यंत महाग राहत असल्याने ते शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे बँकांनी कर्ज वितरण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सुध्दा देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात केले आहे. मान्सूनचे आगमण होताच पेरणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदीस सुरूवात केली आहे. यासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे कर्ज काढण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये जात आहेत. मात्र विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळेच कर्ज वितरणाची गती अत्यंत धिम्मी असल्याचे दिसून येते. जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ११८ कोटी १ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट चालू खरीप हंगामात देण्यात आले आहे. मात्र १० जूनपर्यंत केवळ ३९ कोटी २९ लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. १० हजार ४२९ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यातही आजपर्यंत झालेल्या कर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुमारे २५ कोटी ६० लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. (नगर प्रतिनिधी)मेळाव्यांच्या माध्यमातून जनजागृतीबँकांकडून कर्ज घेण्याची पध्दती, कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले याबाबतची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे बिनव्याजी कर्ज मिळत असतानाही शेतकरी सावकार किंवा बचत गटांकडून जास्त व्याजाचे कर्ज घेतात. मात्र बँकेकडून कर्ज घेत नाही. कर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक बँक मोठ्या गावांमध्ये शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहे. या मेळाव्यामध्ये महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलविले जात आहे. तिथेच दाखले घेऊन कर्जाबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत.