शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वितरण कासवगतीनेच

By admin | Updated: June 17, 2016 01:19 IST

खरीप हंगामाच्या कामांना वेग आला असला तरी कर्ज वितरणाची गती मात्र धिम्मीच असल्याचे दिसून येते.

४० कोटींचे कर्ज वाटप : जिल्हाभरातील १० हजार ४२९ शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : खरीप हंगामाच्या कामांना वेग आला असला तरी कर्ज वितरणाची गती मात्र धिम्मीच असल्याचे दिसून येते. १० जून पर्यंत जिल्हाभरातील फक्त १० हजार ४२९ शेतकऱ्यांना ३९ कोटी २९ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. आधुनिक पध्दतीने शेती करण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. बियाणे, खते व मजुरांची मजुरी सुध्दा वाढली आहे. शेतीसाठी लाखो रूपये खर्च येतो. एवढा पैसा शेतकऱ्यांजवळ राहत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्याला सावकाराकडून किंवा बचतगटाकडून कर्ज काढावे लागते. हे कर्ज अत्यंत महाग राहत असल्याने ते शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे बँकांनी कर्ज वितरण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सुध्दा देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात केले आहे. मान्सूनचे आगमण होताच पेरणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदीस सुरूवात केली आहे. यासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे कर्ज काढण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये जात आहेत. मात्र विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळेच कर्ज वितरणाची गती अत्यंत धिम्मी असल्याचे दिसून येते. जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ११८ कोटी १ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट चालू खरीप हंगामात देण्यात आले आहे. मात्र १० जूनपर्यंत केवळ ३९ कोटी २९ लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. १० हजार ४२९ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यातही आजपर्यंत झालेल्या कर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुमारे २५ कोटी ६० लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. (नगर प्रतिनिधी)मेळाव्यांच्या माध्यमातून जनजागृतीबँकांकडून कर्ज घेण्याची पध्दती, कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले याबाबतची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे बिनव्याजी कर्ज मिळत असतानाही शेतकरी सावकार किंवा बचत गटांकडून जास्त व्याजाचे कर्ज घेतात. मात्र बँकेकडून कर्ज घेत नाही. कर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक बँक मोठ्या गावांमध्ये शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहे. या मेळाव्यामध्ये महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलविले जात आहे. तिथेच दाखले घेऊन कर्जाबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत.