शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

कर्ज वितरण कासवगतीनेच

By admin | Updated: June 17, 2016 01:19 IST

खरीप हंगामाच्या कामांना वेग आला असला तरी कर्ज वितरणाची गती मात्र धिम्मीच असल्याचे दिसून येते.

४० कोटींचे कर्ज वाटप : जिल्हाभरातील १० हजार ४२९ शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : खरीप हंगामाच्या कामांना वेग आला असला तरी कर्ज वितरणाची गती मात्र धिम्मीच असल्याचे दिसून येते. १० जून पर्यंत जिल्हाभरातील फक्त १० हजार ४२९ शेतकऱ्यांना ३९ कोटी २९ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. आधुनिक पध्दतीने शेती करण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. बियाणे, खते व मजुरांची मजुरी सुध्दा वाढली आहे. शेतीसाठी लाखो रूपये खर्च येतो. एवढा पैसा शेतकऱ्यांजवळ राहत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्याला सावकाराकडून किंवा बचतगटाकडून कर्ज काढावे लागते. हे कर्ज अत्यंत महाग राहत असल्याने ते शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे बँकांनी कर्ज वितरण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सुध्दा देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात केले आहे. मान्सूनचे आगमण होताच पेरणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदीस सुरूवात केली आहे. यासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे कर्ज काढण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये जात आहेत. मात्र विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळेच कर्ज वितरणाची गती अत्यंत धिम्मी असल्याचे दिसून येते. जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ११८ कोटी १ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट चालू खरीप हंगामात देण्यात आले आहे. मात्र १० जूनपर्यंत केवळ ३९ कोटी २९ लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. १० हजार ४२९ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यातही आजपर्यंत झालेल्या कर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुमारे २५ कोटी ६० लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. (नगर प्रतिनिधी)मेळाव्यांच्या माध्यमातून जनजागृतीबँकांकडून कर्ज घेण्याची पध्दती, कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले याबाबतची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे बिनव्याजी कर्ज मिळत असतानाही शेतकरी सावकार किंवा बचत गटांकडून जास्त व्याजाचे कर्ज घेतात. मात्र बँकेकडून कर्ज घेत नाही. कर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक बँक मोठ्या गावांमध्ये शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहे. या मेळाव्यामध्ये महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलविले जात आहे. तिथेच दाखले घेऊन कर्जाबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत.