शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

जिल्ह्यात ४२ गावांना पुराचा धोका

By admin | Updated: May 13, 2015 01:17 IST

गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या १० नद्या वाहतात. या नदी काठावर जवळजवळ ४२ गावे आहेत.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या १० नद्या वाहतात. या नदी काठावर जवळजवळ ४२ गावे आहेत. जिल्ह्यात सरासरी १५०० ते २००० मिमीच्या वर पाऊस पडतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यात ४२ गावांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व सीमेवरून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या पाच मोठ्या नद्या वाहतात. त्याचबरोबर बांडे, पर्लकोटा, गाढवी, खोब्रागडी, पाल, कठाणी, दिना यासुद्धा नद्या आहेत. जिल्ह्यातील शेकडो गावे नदींच्या काठी किंवा खोलगट भागामध्ये वसली आहेत. पावसाळ्यादरम्यान पावसाचे प्रमाण जास्त झाल्यानंतर या गावांमध्ये पुराचे पाणी शिरून जीवित व आर्थिक हानी होत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. मागील वर्षी तर सततच्या पुरामुळे सुमारे चार महिने जनजीवन विस्कळीत झाले होते. दरवर्षी जिल्ह्यातील जवळपास ४२ गावांना पुराचा फटका बसतो. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील शिवणी, कृपाळा, गोविंदपूर, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, गोमणी, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव, कळमगाव, आष्टी, अनखोडा, आरमोरी तालुक्यातील वघाळा, शिवणी बु., सायगाव, डोंगरसावंगी, वैरागड, देसाईगंज तालुक्यातील देसाईगंज, विसोरा, सावंगी, अरततोंडी, किन्हाळा, कुरखेडा तालुक्यातील कुरखेडा, मोहगाव, सायटोला, कुंभीटोला, मालेवाडा, बांधगाव, अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, गडअहेरी, चिंचगुंडी, दामरंचा, एटापल्ली तालुक्यातील हिंदूर, हिक्केर, झारेवाडा, भामरागड तालुक्यातील भामरागड, सिरोंचा तालुक्यातील मृदूकृष्णापूर, मोयाबीनपेठा, दर्शेवाडा, परसेवाडा, अंकिसा, पेडलाया, असरअल्ली, सोमनूर या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये यापूर्वी पूर येऊन मोठी जीवित व आर्थिक हानी झाली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात पूर येण्यापूर्वीच नागरिकांना सजग करता यावे, नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविता यावे, मागील वर्षीप्रमाणे जीवितहानी होऊ नये तसेच जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर व्यवस्थापनाबाबत उपाययोजना कराव्यात, असे निर्देश शासनाने दिले आहेत. (प्रतिनिधी)