शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. या जिल्ह्यात दिवाळीच्या आधीच हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात होते. दिवाळीसाठी पैसा हाती यावा म्हणून काही शेतकरी मळणीही करतात.

ठळक मुद्देपंचनामे पूर्णत्वाकडे : महसूल विभागाचा अहवाल तयार, मदतीबाबत मात्र अनभिज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने झालेल्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवरील पीकांना पावसाचा फटका बसला आहे. त्यात १६ हजार एकरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे हे शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. सर्वाधिक नुकसान एटापल्ली तालुक्यात झाल्याची नोंद अहवालात घेण्यात आली.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. या जिल्ह्यात दिवाळीच्या आधीच हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात होते. दिवाळीसाठी पैसा हाती यावा म्हणून काही शेतकरी मळणीही करतात. त्याच तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांचा धान ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे पाण्यात भिजला. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पावसाने कहर केला. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजल्या. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले. त्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. केवळ धानच नाही तर दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये सोयाबीन व कापूस पिकालाही बराच फटका बसला आहे.सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाल्याने त्याचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविला जाईल. मात्र आर्थिक मदतीचा निर्णय होण्यास वेळ लागणार आहे.अंतिम पैसेवारी घटणारखरीप पिकांची नेमकी स्थिती कशी आहे, याचा अंदाज येण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी काढली जाते. याला हंगामी पैसेवारी सुद्धा असे म्हटले आहे. या पैसेवारीचा अहवाल १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी सरासरी ६९ टक्के आढळून आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पिकांची स्थिती थोडी कमकुवत आढळून आली. त्यामुळे सरासरी पैसेवारी ६७ टक्के दाखविण्यात आली आहे. परंतू परतीच्या पावसाने फटका बसल्यानंतर पिकांची स्थिती बिघडून उत्पन्नात घट येणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याची अंतिम पैसेवारी घटणार आहे.एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक नुकसानपरतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका एटापल्ली तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात तब्बल ८ हजार २१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त झाले आहे. त्यापेक्षा कमी नुकसान कोणत्याच शेतकऱ्यांचे झालेले नाही. या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या ७०७० आहेत. बाधित गावांचीही संख्या सर्वाधिक १९४ आहे. या तालुक्यात बहुतांश क्षेत्र धानपिकाचे आहे.

टॅग्स :agricultureशेती