शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. या जिल्ह्यात दिवाळीच्या आधीच हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात होते. दिवाळीसाठी पैसा हाती यावा म्हणून काही शेतकरी मळणीही करतात.

ठळक मुद्देपंचनामे पूर्णत्वाकडे : महसूल विभागाचा अहवाल तयार, मदतीबाबत मात्र अनभिज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने झालेल्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवरील पीकांना पावसाचा फटका बसला आहे. त्यात १६ हजार एकरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे हे शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. सर्वाधिक नुकसान एटापल्ली तालुक्यात झाल्याची नोंद अहवालात घेण्यात आली.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. या जिल्ह्यात दिवाळीच्या आधीच हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात होते. दिवाळीसाठी पैसा हाती यावा म्हणून काही शेतकरी मळणीही करतात. त्याच तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांचा धान ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे पाण्यात भिजला. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पावसाने कहर केला. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजल्या. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले. त्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. केवळ धानच नाही तर दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये सोयाबीन व कापूस पिकालाही बराच फटका बसला आहे.सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाल्याने त्याचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविला जाईल. मात्र आर्थिक मदतीचा निर्णय होण्यास वेळ लागणार आहे.अंतिम पैसेवारी घटणारखरीप पिकांची नेमकी स्थिती कशी आहे, याचा अंदाज येण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी काढली जाते. याला हंगामी पैसेवारी सुद्धा असे म्हटले आहे. या पैसेवारीचा अहवाल १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी सरासरी ६९ टक्के आढळून आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पिकांची स्थिती थोडी कमकुवत आढळून आली. त्यामुळे सरासरी पैसेवारी ६७ टक्के दाखविण्यात आली आहे. परंतू परतीच्या पावसाने फटका बसल्यानंतर पिकांची स्थिती बिघडून उत्पन्नात घट येणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याची अंतिम पैसेवारी घटणार आहे.एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक नुकसानपरतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका एटापल्ली तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात तब्बल ८ हजार २१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त झाले आहे. त्यापेक्षा कमी नुकसान कोणत्याच शेतकऱ्यांचे झालेले नाही. या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या ७०७० आहेत. बाधित गावांचीही संख्या सर्वाधिक १९४ आहे. या तालुक्यात बहुतांश क्षेत्र धानपिकाचे आहे.

टॅग्स :agricultureशेती