शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसतर्फे देसाईगंज येथे मोर्चा

By admin | Updated: March 3, 2016 01:25 IST

कुरखेडा, कोरची, देसाईगंज व आरमोरी या तालुक्यातील धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे हे सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे.

एसडीओंना निवेदन सादर : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करादेसाईगंज : कुरखेडा, कोरची, देसाईगंज व आरमोरी या तालुक्यातील धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे हे सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे. धान उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, धानाला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव द्यावा, कर्ज माफ करावे, नगर पंचायत क्षेत्रात रोहयोची कामे सुरू करावी, धान खरेदी केंद्राच्या जागेत गोदामाचे बांधकाम करावे, धानाचे भाव वाढविण्यात यावे आदी मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देसाईगंज येथे स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, पंचायत समितीचे उपसभापती नितीन राऊत, पं. स. सदस्य परसराम टिकले, शिवाजी राऊत, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, आरिफ खानानी, शेहजाद शेख, राजेंद्र बुल्ले, विलास ढोरे, किशोर वनमाळी, निलोफर शेख, चंदू वडपल्लीवार, सुधीर भातकुलकर, मनिषा दोनाडकर, आनंदराव आकरे, बग्गुजी ताडाम, मंगला कोवे, श्रीनिवास आंबटवार, मिलींद खोब्रागडे, यादव गायकवाड, मुखरू देशमुख, इंदिरा मोहुर्ले, मोहन भुते, सुरेश मेश्राम, तुळशीराम काशीकर, रामभाऊ हस्तक यांनी केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात मोर्चा गेल्यानंतर उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे व तहसीलदार अजय चरडे यांनी निवेदन स्वीकारले. सदर निवेदन शासनाकडे पाठवून मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)